Pandharichi Wari : शिंदे-फडणवीस सरकारच्या 'या' निर्णयाचे वारकर्‍यांकडून जोरदार स्वागत

इतिहासात पहिल्यांदाच शासकीय महापूजा सुरु असताना मुखदर्शन सुरु ठेवण्याचा निर्णय


कोणालाही व्हीआयपी एंट्री (VIP Entry) मिळणार नाही


पंढरपूर : राज्यभरातून लाखो वारकरी तहानभूक विसरुन विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असतात. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या या वारकर्‍यांना आषाढी एकादशीदिवशी (Aashadhi Ekadashi) होणार्‍या शासकीय पुजेमुळे मात्र बराच काळ ताटकळत थांबावे लागते. पण यंदाच्या शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde - Fadanvis Government) एवढी पायपीट करुन येणार्‍या सर्व माऊलींना बाहेर थांबवून शासकीय महापूजा आटोपण्याची गोष्ट पटली नाही आणि महापूजा सुरु असतानादेखील मुखदर्शन सुरु ठेवण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय इतिहासात पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे.


यापूर्वी विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरू व्हायच्या चार तास आधीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात पार पडतो. परंतु रांगेतला कालावधी चार तासांनी वाढल्याने वारकऱ्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळेच आषाढी एकादशी वारीतील या पर्वणीच्या दिवशी दिवसभर दर्शनाची वाट पाहणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था केल्याने या वेळात जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन होणार आहे.



कोणालाही व्हीआयपी एंट्री (VIP Entry) मिळणार नाही

याआधी शासकीय पूजा पार पडल्यानंतरही राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करत. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना आणखी काही काळ ताटकळत राहावे लागे. याबाबतदेखील शिंदे-फडणवीस सरकारने एक धाडसी निर्णय घेतला आहे. यानुसार आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी आजच्या घोषणेत म्हटले.


यामुळे एकादशी दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना मात्र चांगलाच चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला व्हीआयपी बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार असल्याने मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाही. या निर्णयामुळे वारकरी संप्रदाय सुखावला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे