Bakari Eid: छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथे मुस्लीम समाजाने घेतला कुर्बानी न देण्याचा निर्णय

  274

छत्रपती संभाजीनगर:  २९ जूनला आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकत्र येत आहेत त्या पार्श्वभुमीवर राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीला अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी बकरी ईदनिमित्ताने करावयाच्या सुरक्षा योजनांवर चर्चा झाली. त्याचवेळी, छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथे मुस्लीम बांधवांनी शहरात कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी त्या दिवशी बकरा कुर्बानी न देण्याचे ठरवले आहे.


सद्याची राज्यातील परिस्थिती पाहता एकाच दिवशी येणारे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे हे दोन्ही सण शांतेत साजरे करण्यात यावेत यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या वाळूज पोलिसांनी वाळूज भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लीम समाजाकडून घेण्यात आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचा देखील या बैठकीत निर्णय झाला.



नांदगाव येथे बकरी ईदसाठी लाखोंची उलाढाल


येत्या २९ तारखेला मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने बकऱ्यांच्या कुर्बानीसाठी नाशिकच्या नांदगाव येथील आठवडे बाजारात लाखोंची उलाढाल होत मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी - विक्री झाली. पाच हजार रुपयांपासून ते  ४०  हजार रुपये किंमतीच्या बोकडांची मागणी आज बाजारात होती.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील