Bakari Eid: छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथे मुस्लीम समाजाने घेतला कुर्बानी न देण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर:  २९ जूनला आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकत्र येत आहेत त्या पार्श्वभुमीवर राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीला अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी बकरी ईदनिमित्ताने करावयाच्या सुरक्षा योजनांवर चर्चा झाली. त्याचवेळी, छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथे मुस्लीम बांधवांनी शहरात कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी त्या दिवशी बकरा कुर्बानी न देण्याचे ठरवले आहे.


सद्याची राज्यातील परिस्थिती पाहता एकाच दिवशी येणारे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे हे दोन्ही सण शांतेत साजरे करण्यात यावेत यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या वाळूज पोलिसांनी वाळूज भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लीम समाजाकडून घेण्यात आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचा देखील या बैठकीत निर्णय झाला.



नांदगाव येथे बकरी ईदसाठी लाखोंची उलाढाल


येत्या २९ तारखेला मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने बकऱ्यांच्या कुर्बानीसाठी नाशिकच्या नांदगाव येथील आठवडे बाजारात लाखोंची उलाढाल होत मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी - विक्री झाली. पाच हजार रुपयांपासून ते  ४०  हजार रुपये किंमतीच्या बोकडांची मागणी आज बाजारात होती.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे