Cruelty : मालकाने कामाला जुंपून ठेवलंय; असं तसं नव्हे तर चक्क साखळदंडाने बांधून!

धाराशिवमध्ये माणुसकीला कलंक ठरणारी घटना


धाराशिव : कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांकडून बॉसने कामाला जुंपून ठेवलंय असं वारंवार बोललं जातं. पण बॉसने काम करण्यासाठी खरंच बांधून ठेवलं तर? ऐकून विचित्र जरी वाटलं तरी धाराशिव जिल्ह्यात माणुसकीला कलंक ठरणारी एक घटना समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ढोकी आणि खामसवाडी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका कंत्राटदारानं चक्क ११ मजुरांना ते पळून जाऊ नयेत, याकरता साखळदंडाने बांधून ठेवल्याचे आढळले आहे.


धाराशिव जिल्ह्यातल्या भूम (Bhum) तालुक्यातला संतोष शिवाजी जाधव या कंत्राटदाराने हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर इथून शेतमजूर आणले होते. या मजूरांकडून तो दिवसभर बळजबरीने विहीरीवर काम करुन घेत असे. एवढंच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही या मजुरांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांना साखळदंडाने बांधून ठेवलं जात होतं. जेवण आणि शौचासाठीही या मजुरांना परवानगी दिली जात नव्हती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हे मजूर घाबरलेल्या अवस्थेत साखळदंडाने बांधलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांची सुटका केली आणि काल १७ जूनला शनिवारी रात्री हे मजूर आपल्या गावी परत गेले.



कोण आहेत शेतमजूर ?

मिळालेल्या माहितीवरुन याबाबत तपास करण्यासाठी अतुल कुलकर्णी या पोलीस अधिका-यांनी एक पथक तयार केले. या पथकाने टाकलेल्या छाप्यात शेतमजूर साखळदंडाने बांधलेले आढळून आले. संदिप रामकिसन घुकसे (वय २३ वर्षे रा. कवठा, ता. सेनगाव जि. हिंगोली), भगवान अशोक घुकसे, (२६ वर्षे, रा. कवठा ता. सेनगाव जि. हिंगोली) यांच्यासह मारुती पिराजी जटाळकर (वय ४० वर्षे,रा. आतकुर, ता. धर्माबाद), राजू गनुलाल म्हात्रे (वय २२ वर्षे रा. मध्य प्रदेश), मंगेश जनार्दन कानटजे (वय २६ वर्षे, रा. कुलमखेड, मा. बुलढाणा, बालाजी शामराव वाघमारे (वय ३२ वर्षे, रा.लिंबा, ता. देगलूर जि. नादेंड), गणेश अशोक पवार,(वय ३० वर्षे, रा. नाशिक) अशी या शेतमजुरांची नावे आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये