Cruelty : मालकाने कामाला जुंपून ठेवलंय; असं तसं नव्हे तर चक्क साखळदंडाने बांधून!

  156

धाराशिवमध्ये माणुसकीला कलंक ठरणारी घटना


धाराशिव : कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांकडून बॉसने कामाला जुंपून ठेवलंय असं वारंवार बोललं जातं. पण बॉसने काम करण्यासाठी खरंच बांधून ठेवलं तर? ऐकून विचित्र जरी वाटलं तरी धाराशिव जिल्ह्यात माणुसकीला कलंक ठरणारी एक घटना समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ढोकी आणि खामसवाडी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका कंत्राटदारानं चक्क ११ मजुरांना ते पळून जाऊ नयेत, याकरता साखळदंडाने बांधून ठेवल्याचे आढळले आहे.


धाराशिव जिल्ह्यातल्या भूम (Bhum) तालुक्यातला संतोष शिवाजी जाधव या कंत्राटदाराने हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर इथून शेतमजूर आणले होते. या मजूरांकडून तो दिवसभर बळजबरीने विहीरीवर काम करुन घेत असे. एवढंच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही या मजुरांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांना साखळदंडाने बांधून ठेवलं जात होतं. जेवण आणि शौचासाठीही या मजुरांना परवानगी दिली जात नव्हती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हे मजूर घाबरलेल्या अवस्थेत साखळदंडाने बांधलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांची सुटका केली आणि काल १७ जूनला शनिवारी रात्री हे मजूर आपल्या गावी परत गेले.



कोण आहेत शेतमजूर ?

मिळालेल्या माहितीवरुन याबाबत तपास करण्यासाठी अतुल कुलकर्णी या पोलीस अधिका-यांनी एक पथक तयार केले. या पथकाने टाकलेल्या छाप्यात शेतमजूर साखळदंडाने बांधलेले आढळून आले. संदिप रामकिसन घुकसे (वय २३ वर्षे रा. कवठा, ता. सेनगाव जि. हिंगोली), भगवान अशोक घुकसे, (२६ वर्षे, रा. कवठा ता. सेनगाव जि. हिंगोली) यांच्यासह मारुती पिराजी जटाळकर (वय ४० वर्षे,रा. आतकुर, ता. धर्माबाद), राजू गनुलाल म्हात्रे (वय २२ वर्षे रा. मध्य प्रदेश), मंगेश जनार्दन कानटजे (वय २६ वर्षे, रा. कुलमखेड, मा. बुलढाणा, बालाजी शामराव वाघमारे (वय ३२ वर्षे, रा.लिंबा, ता. देगलूर जि. नादेंड), गणेश अशोक पवार,(वय ३० वर्षे, रा. नाशिक) अशी या शेतमजुरांची नावे आहेत.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती