Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना 'फटकारले'

सावरकरांचं नाव पुसायला निघालेल्या आणि धर्मांतरणाला समर्थन देणा-या कर्नाटक सरकारबद्दल 'उद्धवजी' तुमचं मत काय?


मुंबई : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार (Congress) आल्याने राज्यात ठाकरे गट प्रचंड खूश झाला होता. महाविकास आघाडीचे (MVA) नेते सातत्याने महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार असं वक्तव्य करत होते. मात्र कर्नाटक सरकारने नुकत्याच घेतलेल्या काही निर्णयांवर भाजपाकडून (BJP) सडकून टीका होत आहे. यासंदर्भात मत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आता 'आता उद्धव ठाकरे यांची यावर प्रतिक्रिया काय आहे?' असं म्हणत ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट टार्गेट केलं आहे.


सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कर्नाटक सरकारने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. कर्नाटकात मंत्रिमंडळ बैठकीत अभ्यासक्रमातील सावरकरांचा धडा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून भाजप सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदादेखील रद्द केला गेला आहे. या निर्णयांना भाजप नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे.



सत्तेसाठी केली तडजोड : देवेंद्र फडणवीस

एखादा धडा तुम्ही अभ्यासक्रमातून वगळू शकता, मात्र ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. ते लोकांच्या मनातून एकही स्वातंत्र्यसंग्रामी काढू शकत नाही. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्यासाठी कर्नाटकचं सरकार निर्णय घेत आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.


पुढे ते म्हणाले, माझा मविआला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? माझा एक प्रश्न उद्धव ठाकरेजींना आहे की, आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते जर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघालेले आहेत, धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत तर आता तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. सत्तेसाठी तुम्ही तडजोड केली हे यातून अतिशय स्पष्ट होत आहे. हे असे निर्णय घेतल्याने ते कोणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरुन पुसू शकणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.



अराजकतेचे उदाहरण म्हणजे काँग्रेस : चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेसला मत देणे म्हणजे या देशात किती अराजकता होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. उद्धव ठाकरेंनी यावर आता आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. आता उध्दव ठाकरे यांनी लंडनमधून किंवा महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय मान्य आहे का? आणि या नंतरही शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का, हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

२९ महापालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार! - नवनाथ बन; मुंबई महापालिका निवडणूक ही एका कुटुंबाची शेवटची लढाई

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकास कामांच्या बळावर आधीच मारले आहे. मुंबईचा विकास

'संजय राऊतांनी आधी आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे आणि मग उबाठाची वाट लावावी'; मंत्री संजय शिरसाटांचा खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर: आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे.

धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर

विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद

आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या

मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या