Cyber Crime : वर्धा नागरी सहकारी बँक सायबर हल्ल्यात पाच आरोपींना अटक

  296

तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजार रुपये विविध खात्यांत वळवले


वर्धा : अकाऊंट हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांचे (Cyber crime) प्रमाण वाढले असून वर्ध्यातून आणखी एक सायबर गुन्ह्याची घटना समोर आली होती. या घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्ध्यातील वर्धा नागरी सहकारी बँकेचं (Wardha Nagri Sahakari Bank) अकाऊंट हॅक (Account hack) केल्याची ही घटना होती. या घटनेत आरोपांनी शक्कल लढवत येस बँकेची (Yes Bank) युटिलिटी हॅक करुन बँकेत असलेल्या वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँकेच्या खात्यातून १ कोटी २१ लाख १६ हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी संबंधित पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे.


येस बॅंकेत वर्धा नागरी सहकारी बॅंकेच्या असलेल्या खात्यातून आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) व्यवहार होत असत. वर्धा बॅंकेला २४ मे रोजी बुधवारी सुट्टी होती. याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी पहाटे ६ ते सकाळी ८ या चार तासांत येस बॅंकेची युटिलीटी (Utility) हॅक करुन सायबर हल्ला केला. यामध्ये वर्धा नागरी बँकेच्या खात्यातून तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजारांची रक्कम विविध खात्यात वळती केली.


सकाळी बँकेत आलेल्या कर्मचा-यांनी नेहमीप्रमाणे कामासाठी संगणक (Computers) सुरु केले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी कांचन अनिल केळकर यांनी या कर्मचा-याने ताबडतोब वर्धा शहर पोलिसात (Wardha Police) गुन्हा दाखल केला. सायबर सेलकडून (Cyber cell) पुढील तपास करण्यात आला. यातील नायजेरियन नागरिक असलेला आरोपीच या हॅक प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे.



५० ते ६० अकाऊंटमध्ये रक्कम ट्रान्सफर

आरोपींनी ही रक्कम ५० ते ६० वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर (Money Transfer) केली होती. मणिपूर, मिझोरम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, तेलंगणा, आसाम, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आदी ठिकाणच्या २४ ते २५ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले होते. यात पोलिसांनी २३ लाख १० हजार रुपये थांबवले आहेत. जवळपास ६० अकाऊंट गोठवले आहेत. १६ एटीएम (ATM), ९ मोबाईल व इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी वर्धा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.



तपासासाठी आरबीआयची पाच पथके पाच ठिकाणी

या प्रकरणाच्या तपासासाठी आरबीआय टीमची (RBI Team) पाच पथके पाच दिवस वर्ध्यात होती. वर्धा, बंगळुरु, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद अशा पाच ठिकाणी ही पथके तैनात होती. वेगवेगळ्या टीमच्या कौशल्यपू्र्ण कामगिरीमुळे घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. येस बँकेच्या सर्व्हरचा (Server) आयपी अ‍ॅड्रेस (IP Address) हॅक करणारा बंगळुरुमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतलं. तर दिल्ली इथून दोन आणि मुंबई इथून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या