Jitendra Awhad : आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

  191

नागपूर : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याबाबत ट्विटरवर बदनामीकारक (Defamation) मजकूर टाकणारे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागपूर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष संध्या गोतमारे व पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.


आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ९ जून रोजी रात्री १२ वाजून ३३ मिनिटांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटरवर अपलोड केला आहे. हा त्यांना बदनाम करण्याचा व त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठवण्याचा प्रकार आहे.


याची चौकशी करून आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजप नागपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा संध्या गोतमारे, महामंत्री राजूताई भोले, कल्पना सगदेव, अनिता गुप्ता, ललिता झलके ,जयश्री हिंगने, लक्ष्मी बैंस, पूजा धांडे, मौसमी गुप्ता, छाया शुक्ला, सुनिता चोपावार कल्याणी जयपुरकर, खान, कंगाली यांनी पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.


याआधी कालच भाजप महिला मोर्चा मालवण तालुक्याच्यावतीने आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे.

भाजप महाराष्ट्र महिला मोर्चा सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य रश्मी लुडबे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पूजा करलकर, माजी नगरसेविका पूजा सरकारे, राणी पराडकर, मिलन कांबळी, वंदना चुडनाईक आदी महिला कार्यकर्त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंडगे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनिधींकडून समाजात महिला सबलीकरण तसेच सामाजिक, आर्थिकस्तरावर महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. जिथे महिलांवर अन्याय होतो, तिथे आवाज उठवतो; पण सध्या भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आव्हाड करत आहेत. चित्रा वाघ यांची मानहानी करून त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रकार आव्हाड यांनी केला आहे. हे सहन केले जाणार नाही. याबाबत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे.