दिंडोरी येथील रणतळेजवळ तिहेरी अपघात; बसने मारली पलटी

जीवीतहानी नाही, काही प्रवासी किरकोळ जखमी


दिंडोरी: नाशिक-दिंडोरी-वणी मार्गावर रणतळेजवळ बस सह तीन वाहनांमध्ये अपघात झाला असून अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र बस व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.


दिंडोरीकडून नाशिककडे जाणारी बस (क्रमांक- MH40N9432) रणतळेजवळ चढाव चढत असतांना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या बोलेरो (क्रमांक-MH15BC6226) वाहनास धडकल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. तसेच बसच्या मागे असलेली अल्टोटो कार (क्रमांक-MH05CA149) ही बसला मागून धडकली. यामध्ये बोलेरोच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असल्याचे समजते. तर, बसमध्ये एकुण ३४ प्रवासी प्रवासी होते.


दरम्यान, नाशिक-दिंडोरी-वणी या मार्गावर होणारे सततचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा