नाना पटोले होणार का मुख्यमंत्री? बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ५ जूनला असलेल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात बॅनरबाजी करण्यात आली. यात पटोलेंचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला. काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी पटोलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ही बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याचे संकेत दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.


यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे तर शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री असे नागपुरात बॅनर्स लागले होते. आता काँग्रेसकडून नाना पटोलेंचं नाव पुढे करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीन उमेदवार भावी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. केवळ नागपूरच नव्हे तर गेल्या आठवड्यात कल्याण व आता भंडारा अशा ठिकाणीही पटोलेंच्या समर्थकांनी 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करत बॅनरबाजी केली होती.



काय म्हणाले अजित पवार?



दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या बॅनरबाजीसंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. असं कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, त्यासाठी १४५ हा जादुई आकडा उभा करावा लागतो. अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं त्यामुळे ते पोस्टर लावतात, पण शेवटी सगळं आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतं, असं अजित पवार म्हणाले.


यावर नाना पटोलेंनी सौम्य शब्दांत प्रतिक्रिया दिली. "हा कार्यकर्त्यांचा एक प्रकारे उत्साह असतो. पण विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, त्यामुळे अशा पोस्टरची गरज नाही आणि असे पोस्टर लावूही नयेत, अशी मी कार्यकर्त्यांना विनंती करेन", असं नाना पटोले म्हणाले.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह