मुरबाडचा मिमिक्री मॅन गणेश देसले ‘आवाजाचा जादूगार’

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यातील एकलहरे गावचा सुपुत्र गणेश देसले हा आपल्या जादुई आवाजाने मिमिक्री मॅन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.



कानाला चिरपरिचित आवाजांची ओळख असली तरी काही पडद्याआड गेलेल्या विभूतींचा जीवनपट गणेशच्या मिमिक्रीतून डोळ्यासमोर साकार होत आहे. स्व. दादा कोंडके, निळू फुले आणि नाना पाटेकर यांचे भारदस्त आवाज त्याच्या कंठातून लिलया निघतात. गणेश हा मुरबाडच्या एका खेडेगावातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. कुठेही कलेचे धडे न घेतलेल्या गणेश देसलेच्या या कलेमुळे तो आज मुरबाडच्या मुकुटातील हिऱ्यासारखा चमकू लागला आहे.



मागील १० वर्षांपासून ग्रामीण भागातील कलाकार वेगवेगळ्या कला क्षेत्रात पुढे येऊन स्टेज शो करताना निदर्शनास येतात. याचप्रकारे आवर्जून दखल घेण्यासारखा तरुण कलावंत म्हणजे गणेश देसले याचा उल्लेख करता येईल.



गणेश देसले याने यशाचे शिखर गाठण्यासाठी मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, अक्षय कुमार, निळू फुले, सयाजी शिंदे, कॉमेडी किंग जॉनी लिव्हर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका, गान कोकिळा लता मंगेशकर यांचा आवाज अगदी हुबेहूब काढतो. तसेच मकरंद अनासपुरे, हृतिक रोशन, दक्षिणेकडचा सुपरस्टार रजनीकांत, अल्लू अर्जुन, अंकुश चौधरी आदींच्या आवाजाची मिमिक्री करत त्याने आपली कला जोपासली असल्याचे दिसून येत आहे.



गणेश देसले यांचे कार्यक्रम मुंबई, ठाणे, पालघर, वाडा, कर्जत, नवी मुंबई, अहमदनगर, पुणे, गुजरात, कल्याण, मुरबाड आदी ठिकाणी सादर झाले आहेत.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच