भटक्या कुत्र्यांसाठी सुमारे ४२ लाखांचे १४ पिंजरे

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या तीव्र स्वरूप धारण करत आहे. काही दिवसांपूर्वी कळवा येथील मनीषा नगर येथे रात्री उशिरा एका जेष्ठ नागरिकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यानंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते. ठाणे शहरातील सर्वच प्रभागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या भटक्या कुत्र्यांचा आळा घालण्यासाठी १४ पिंजऱ्यांची व्यवस्था
करण्यात येणार आहे.



त्यासाठी सुमारे ४२ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक ठिकाणी दुचाकी स्वारांवर रस्तोरस्ती कुत्र्यांच्या टोळ्या हल्ले करत आहेत. तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर हल्ले करत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.



भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाबरोबरच आता केंद्रीय प्राणी आयोगाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी चक्क स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्याचे ठरवले आहे. ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांनी संख्या ७५ हजारांच्या आसपास पोहोचली असून यात सुमारे ५ हजारच्या आसपास पाळीव श्वान आहेत.



ठाणे महापालिकेच्या वागळे इस्टट विभागात निर्बिजीकरण केंद्र उभारले असून या केंद्रात आधी असलेल्या लोखंडी पिंजऱ्याऐवजी आता चक्क स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. एका पिंजऱ्यात दोन श्वान याप्रमाणे ४२ लाख खर्चून १४ स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. लोखंड गंजते त्यामुळे श्वानांना जखमा होतात म्हणून केंद्रीय प्राणी आयोगाने सुचवल्यानुसार लोखंडाचा बेस असलेले ४ बाय ५ फुटाचे डबल साईझचे स्टीलचे पिंजरे उभारले जात आहेत.

Comments
Add Comment

अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात

वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पहिली पेटी दाखल नवी मुंबई : कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा

कल्याण-डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग; मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. महापालिकेतील

कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत; कोकणकन्या, मत्स्यगंधा...

पनवेल: कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक हे विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय

शिवसेनेचे 'मिशन मुंबई महापालिका'

कडोंमपा, उल्हासनगरमध्ये भाजपला ‘चेकमेट’ करण्याचा डाव ठाणे/ कल्याण/ उल्हासनगर : मुंबई महानगरपालिकेच्या

कडोंमपातील उबाठाचे ४ नगरसेवक फुटल्याची चर्चा

७ नगरसेवक गट नोंदणीसाठी हजर कल्याण : कल्याण-डोंबिवली महानरपालिकेच्या निकालानंतर स्थानिक राजकीय नाट्याची

डोंबिवलीत गॅस गळती, बालकासह पाच जण जखमी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेच्या नवनीत नगरमध्ये घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरमधून वायू गळती झाली. या गॅस