भटक्या कुत्र्यांसाठी सुमारे ४२ लाखांचे १४ पिंजरे

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या तीव्र स्वरूप धारण करत आहे. काही दिवसांपूर्वी कळवा येथील मनीषा नगर येथे रात्री उशिरा एका जेष्ठ नागरिकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यानंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते. ठाणे शहरातील सर्वच प्रभागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या भटक्या कुत्र्यांचा आळा घालण्यासाठी १४ पिंजऱ्यांची व्यवस्था
करण्यात येणार आहे.



त्यासाठी सुमारे ४२ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक ठिकाणी दुचाकी स्वारांवर रस्तोरस्ती कुत्र्यांच्या टोळ्या हल्ले करत आहेत. तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर हल्ले करत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.



भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाबरोबरच आता केंद्रीय प्राणी आयोगाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी चक्क स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्याचे ठरवले आहे. ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांनी संख्या ७५ हजारांच्या आसपास पोहोचली असून यात सुमारे ५ हजारच्या आसपास पाळीव श्वान आहेत.



ठाणे महापालिकेच्या वागळे इस्टट विभागात निर्बिजीकरण केंद्र उभारले असून या केंद्रात आधी असलेल्या लोखंडी पिंजऱ्याऐवजी आता चक्क स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. एका पिंजऱ्यात दोन श्वान याप्रमाणे ४२ लाख खर्चून १४ स्टेनलेस स्टीलचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. लोखंड गंजते त्यामुळे श्वानांना जखमा होतात म्हणून केंद्रीय प्राणी आयोगाने सुचवल्यानुसार लोखंडाचा बेस असलेले ४ बाय ५ फुटाचे डबल साईझचे स्टीलचे पिंजरे उभारले जात आहेत.

Comments
Add Comment

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या