आडनाव बदलायला सांगणा-यांना गौतमी पाटीलने दिले चोख प्रत्युत्तर

  271

पुणे : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी, हाणामारी, लाठीचार्ज यामुळे ती व तिचे कार्यक्रम कायमच वादाच्या भोवर्‍यात अडकतात. त्यातच गौतमी पाटीलचे मूळ आडनाव चाबुकस्वार असल्याचे समोर आले. त्यामुळे आता तिच्या आडनावावरुन वाद होत आहेत. या वादामुळे मराठा सेवा संघात दोन गट पडले आहेत. तर सुषमा अंधारे मात्र पदर खोचून गौतमीच्या पाठीशी आहेत.


गौतमीने 'पाटील' आडनाव लावू नये यासाठी मराठा सेवा संघातील एक गट आक्रमक झाला तर दुस-या गटाने मात्र गौतमीला पाठिंबा दिला. मराठा समन्वयक राजेंद्र जराड पाटील यांनी 'गौतमीचे आडनाव चाबुकस्वार आहे. ती पाटील आडनाव लावून पाटलांची बदनामी करते आहे. त्यामुळे तिने आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही', असा इशारा दिला.


या इशा-याला तितकंच चोख प्रत्युत्तर गौतमी पाटीलने दिलं आहे. ती म्हणते, 'माझ्या कार्यक्रमात मी कोणाचीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. मला कोण, काय नाव ठेवते त्याने काहीही फरक पडत नाही. पण ज्याला प्रश्न असेल, त्याने आधी माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा. त्यानंतर काय सुरू आहे ते बोलावे', असे आव्हान तिने दिले आहे.


मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होत आहे, हे पटत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. माधुरी दीक्षितच्या 'दीक्षित' आडनावावर कोणीच आक्षेप घेतला नाही, त्यामुळे गौतमीच्या आडनावावरही आक्षेप नसावा असे ते म्हणाले. गौतमीच्या नृत्यांवर आक्षप असेल तर मराठा समाजाच्या मुलींनी तिचे कार्यक्रम पाहू नयेत, त्यांचे आयोजन करु नये. मात्र अशा प्रकारे धमकी देणे चुकीचे व दुर्दैवी असल्याचे सुरेंद्र पाटील म्हणाले.


तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनेदेखील गौतमीला पाठिंबा दर्शवला आहे. 'आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे' अशी एक पोस्टच सुषमा अंधारेंनी फेसबुकवर शेअर केली आहे. माधुरी दीक्षित, ममता कुलकर्णी, माधुरी पवार यांना आडनाव बदलण्याचे सल्ले कोणीही दिले नाहीत, मग गौतमी पाटीललाच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या