जागावाटपाच्या वेळी ‘मोठा भाऊ’ अडचणीचा ठरणार?

मुंबई (विशेष प्रतिनिधी): उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा लोकसभेसाठी १९ जागेचा राग आळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत आपणच मोठे भाऊ असल्याचा दावा केल्यामुळे महाविकास आघाडीतली मतभिन्नता आणखीनच तीव्र झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी यावर जरी मवाळ भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी महाविकास आघाडीतला मोठा भाऊ अनेकांना त्रासदायक ठरणार असल्याची ही चिन्हे आहेत, असे जाणकारांना वाटते.



दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडी सर्व जागा लढवेल आणि त्यातल्या १९ जागा तेव्हाच्या शिवसेनेच्या होत्या, तेवढ्या जागा आमच्या कायम राहतील, असा दावा केला. आज याचा पुनरुच्चार करताना पुन्हा त्यांनी ४८ पैकी १९ जागा शिवसेनेच्या असतील असे नमूद केले. यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेला असंतोष खदखदत असतानाच आज एका मेळाव्यात अजित पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसला आम्ही मोठा भाऊ मानत आलो आहोत; परंतु मागच्या निवडणुकीत विधानसभेतले आकडे दाखवून देतात की आम्ही ५४ आहोत, तर तुम्ही ४४ आहात. त्यामुळे आता मोठे भाऊ आम्हीच आलो आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे अजित पवार म्हणाले.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आम्ही पूर्वीपासून कधीही मोठेपणा मिरवला नाही, असे सांगितले. अनेक वर्षे आमची सदस्यसंख्या नेहमीच जास्त राहिली. मात्र आम्ही सर्वांना आमच्या बरोबरीनेच नेले. सर्वांशी समन्वयातच संबंध ठेवले, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात