शाळेच्या मध्यान्ह भोजनात सापडली पाल, ३५ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

छपरा: बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रसुलपूर टिकुलिया टोला डुमरी येथील विद्यालयात मध्यान्ह भोजनात पाल सापडली असून हे जेवल्यानंतर ३५ मुलं आजारी पडली आहेत.


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे मुलं मध्यान्ह भोजन जेवत असताना एका विद्यार्थ्याच्या ताटात मेलेली पाल आढळली. विद्यार्थ्याने याची माहिती शिक्षकांना देताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मध्यान्ह भोजनाचे वाटप बंद करण्यात आले. काही वेळाने मुलांची प्रकृती ढासळू लागली आणि ५० मुलांना उलट्यांचा त्रास होऊ लागला.


यापैकी ३५ मुलांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पूनम कुमारी यांनी दिलेल्या माहितीनूसार, या मुलांना एका स्वयंसेवी संस्थेद्वारे अन्न वाटप केले जाते. या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न वाटप थांबवण्यात आले आहे.


या घटनेनंतर जिल्ह्याची शासकीय यंत्रणा अलर्टवर असून सर्व मुलांवर योग्य उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम तयार असल्याचे एसडीओ संजय कुमार यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाचे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Digital Fraud News : ८ कोटींची फसवणूक, १२ पानांची चिठ्ठी अन् स्वतःवर गोळी; माजी IPS अमर सिंग चहल यांचा आत्महत्येचा प्रयत्न

पटियाला : पंजाबमधील एक धक्कादायक घटना समोर आली असून, राज्याचे माजी आयपीएस (IPS) अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवर

२०२५ मध्ये जनरेशन झेडने आणला पर्यटनाचा नवा ट्रेंड

प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल नवी दिल्ली : २०२५ मध्ये भारतीयांच्या प्रवासाच्या सवयी

प्रदूषण प्रमाणपत्र नाही, तर पेट्रोल नाही…

राज्य सरकारचे पेट्रोल पंपांना कडक आदेश ओडिसा : भारतातील वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून ओडिशा सरकारने महत्वाचा

अरावली पर्वतरांगेतील ९० टक्के क्षेत्र संरक्षित

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट नवी दिल्ली : राजस्थानमधील अरावली

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर दिल्ली उच्च

भारत आणि न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

२० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह रोजगाराच्या संधींचे दालन खुले नवी दिल्ली : भारताने जागतिक व्यापाराच्या आघाडीवर