शाळेच्या मध्यान्ह भोजनात सापडली पाल, ३५ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

छपरा: बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रसुलपूर टिकुलिया टोला डुमरी येथील विद्यालयात मध्यान्ह भोजनात पाल सापडली असून हे जेवल्यानंतर ३५ मुलं आजारी पडली आहेत.


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे मुलं मध्यान्ह भोजन जेवत असताना एका विद्यार्थ्याच्या ताटात मेलेली पाल आढळली. विद्यार्थ्याने याची माहिती शिक्षकांना देताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मध्यान्ह भोजनाचे वाटप बंद करण्यात आले. काही वेळाने मुलांची प्रकृती ढासळू लागली आणि ५० मुलांना उलट्यांचा त्रास होऊ लागला.


यापैकी ३५ मुलांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पूनम कुमारी यांनी दिलेल्या माहितीनूसार, या मुलांना एका स्वयंसेवी संस्थेद्वारे अन्न वाटप केले जाते. या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न वाटप थांबवण्यात आले आहे.


या घटनेनंतर जिल्ह्याची शासकीय यंत्रणा अलर्टवर असून सर्व मुलांवर योग्य उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम तयार असल्याचे एसडीओ संजय कुमार यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाचे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या