शाळेच्या मध्यान्ह भोजनात सापडली पाल, ३५ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

छपरा: बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रसुलपूर टिकुलिया टोला डुमरी येथील विद्यालयात मध्यान्ह भोजनात पाल सापडली असून हे जेवल्यानंतर ३५ मुलं आजारी पडली आहेत.


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे मुलं मध्यान्ह भोजन जेवत असताना एका विद्यार्थ्याच्या ताटात मेलेली पाल आढळली. विद्यार्थ्याने याची माहिती शिक्षकांना देताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मध्यान्ह भोजनाचे वाटप बंद करण्यात आले. काही वेळाने मुलांची प्रकृती ढासळू लागली आणि ५० मुलांना उलट्यांचा त्रास होऊ लागला.


यापैकी ३५ मुलांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पूनम कुमारी यांनी दिलेल्या माहितीनूसार, या मुलांना एका स्वयंसेवी संस्थेद्वारे अन्न वाटप केले जाते. या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न वाटप थांबवण्यात आले आहे.


या घटनेनंतर जिल्ह्याची शासकीय यंत्रणा अलर्टवर असून सर्व मुलांवर योग्य उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम तयार असल्याचे एसडीओ संजय कुमार यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाचे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे