राज्यात दंगल आणि हिंसाचाराचं वातावरण

शेवगाव : नगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराचा प्रकार घडला. दोन गटांमध्ये वादावादी होऊन दगडफेक करण्यात आली. या घटनेत चार पोलीस जखमी झाले असून अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी ३० ते ३५ जणांना ताब्यात घेतलं आहे , तर २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काल १४ मे ला रात्री ८ च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर अचानक एका गटाने दगडफेक सुरु केली. तर याअगोदर धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली होती, असं दुस-या गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे काल या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणता आली.


याआधी १३ मे ला सकाळी ९:३० - ९:४५ च्या सुमारास नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही इतर धर्मीयांनी बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला विनंती केल्यानंतर पोलीस प्रशासन व तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्याने जमावाने प्रवेश मिळण्याकरता जबरदस्ती केली. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट व पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा तणाव निवळला. दरम्यान देवस्थान ट्रस्टने जमावावर कायदेशीर कारवाई करण्याचं पत्र पोलिसांना पाठवलं आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.


अकोला शहरातही हरिहरपेठेत शनिवारी १३ मे ला रात्री दोन गटांत मोठा राडा झाला. समाजमाध्यमावरील एक पोस्ट या वादाचं कारण असल्याची माहिती मिळाली आहे. जाळपोळ, मारहाण, दगडफेक यांनी हरिहरपेठ पेटलं होतं. या घटनेनंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे