राज्यात दंगल आणि हिंसाचाराचं वातावरण

  214

शेवगाव : नगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराचा प्रकार घडला. दोन गटांमध्ये वादावादी होऊन दगडफेक करण्यात आली. या घटनेत चार पोलीस जखमी झाले असून अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी ३० ते ३५ जणांना ताब्यात घेतलं आहे , तर २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काल १४ मे ला रात्री ८ च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर अचानक एका गटाने दगडफेक सुरु केली. तर याअगोदर धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली होती, असं दुस-या गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे काल या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणता आली.


याआधी १३ मे ला सकाळी ९:३० - ९:४५ च्या सुमारास नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही इतर धर्मीयांनी बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला विनंती केल्यानंतर पोलीस प्रशासन व तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्याने जमावाने प्रवेश मिळण्याकरता जबरदस्ती केली. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट व पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा तणाव निवळला. दरम्यान देवस्थान ट्रस्टने जमावावर कायदेशीर कारवाई करण्याचं पत्र पोलिसांना पाठवलं आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.


अकोला शहरातही हरिहरपेठेत शनिवारी १३ मे ला रात्री दोन गटांत मोठा राडा झाला. समाजमाध्यमावरील एक पोस्ट या वादाचं कारण असल्याची माहिती मिळाली आहे. जाळपोळ, मारहाण, दगडफेक यांनी हरिहरपेठ पेटलं होतं. या घटनेनंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून