निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्याने मुख्यमंत्री खुश व समाधानी आहेत : केंद्रीय मंत्री नारायण राणे

  198

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने दिल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्याने मुख्यमंत्री खुश व समाधानी आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं मी अभिनंदन करतो. मी सकाळी ट्विट केल्याप्रमाणे निकाल शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजुने लागलेला आहे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन".

पुढे ते म्हणाले की, "जर ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर..' अशा जर आणि तरला मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वतःच्या चुकीमुळे शिवसेना संपली, नियमांचं अज्ञान असल्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे हा प्रश्नच आता उरत नाही. माननीय शरद पवार यांनीदेखील आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांची पात्रता, गुणवत्ता काढलेली आहे".

शिंदे - फडणवीस सरकार जोमाने काम करतंय ते काही लोकांना पचत नाही आहे, त्यामुळे हे सरकार कशा रितीने विकास करु शकतं, लोकहित जपू शकतं याचा प्रत्यय दाखवण्याची ही संधी मिळाली आहे, असं म्हणत नारायण राणेंनी शिंदे - फडणवीस सरकारला शुभेच्छा दिल्या.
Comments
Add Comment

बलात्काराची खोटी तक्रार दाखल करुन १ कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी माजी बँक कर्मचारी गजाआड!

मुंबई : मुंबईतील चारकोप पोलिसांनी माजी बँक कर्मचारी डॉली कोटकला अटक केली आहे. तिच्यावर आपल्या माजी प्रियकरावर, जो

डॉक्टरांपेक्षा एक रुपया अधिक पगार पाहिजे; आत्मसन्मानासाठी मुंबईचे 'सफाई कर्मचारी' सरसावले!

मुंबई : मुंबईसारख्या महानगरात स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर घेतलेले मनपाचे सफाई कर्मचारी आता केवळ झाडू न मारता,

Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब