निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्याने मुख्यमंत्री खुश व समाधानी आहेत : केंद्रीय मंत्री नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने दिल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्याने मुख्यमंत्री खुश व समाधानी आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं मी अभिनंदन करतो. मी सकाळी ट्विट केल्याप्रमाणे निकाल शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजुने लागलेला आहे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन".

पुढे ते म्हणाले की, "जर ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर..' अशा जर आणि तरला मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वतःच्या चुकीमुळे शिवसेना संपली, नियमांचं अज्ञान असल्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे हा प्रश्नच आता उरत नाही. माननीय शरद पवार यांनीदेखील आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांची पात्रता, गुणवत्ता काढलेली आहे".

शिंदे - फडणवीस सरकार जोमाने काम करतंय ते काही लोकांना पचत नाही आहे, त्यामुळे हे सरकार कशा रितीने विकास करु शकतं, लोकहित जपू शकतं याचा प्रत्यय दाखवण्याची ही संधी मिळाली आहे, असं म्हणत नारायण राणेंनी शिंदे - फडणवीस सरकारला शुभेच्छा दिल्या.
Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०