दिवा, मुंब्रा परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार

  240

ठाणे ( प्रतिनिधी): ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने दिवा-मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या कल्याण फाटा ते शंकर मंदिर या परिसरातील पाणी पुरवठा बुधवार, १० मे रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत बंद राहणार आहे.


या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुरुस्तीच्या काळात निर्मल नगरी, रामेश्वर पार्क, दोस्ती संकुल परिसर, भोलेनाथ नगर, रोझ नगर, एमएमव्हॅली परिसर, कादर पॅलेस ते किस्मत कॉलनी, चांद नगर परिसर, खडी मशीन रोड, शिवाजी नगर परिसर आदी भागातील पाणी पुरवठा बंद राहील.पाणी कपातीच्या या काळात काटकसरीने पाणी वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या