‘पीएम श्री योजने’अंतर्गत ठाण्यातील प्रथम टप्प्यात १४ शाळांची निवड

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पीएम श्री योजना’ राबली जात आहे. या योजने अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड प्रथम टप्प्यात झाली आहे. निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणांसाठी काम करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील ५ शाळा, महानगरपालिकातील ६ शाळा, नगरपालिका २, शहापुर नगरपंचायत १ अशा प्रकारे शाळांची निवड करण्यात आली आहे.



इमारत दुरुस्ती, नवीन वर्ग खोली, स्वच्छता गृह (मुली, मुले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी), संरक्षण भिंत, सौर ऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब इत्यादी सर्व भैतिक सुविधासाठी शाळेच्या गरजेनुसार शासनाकडे प्रस्ताव सादरिकरण करण्यासाठी कारवाई सुरू आहे.


पीएम श्री योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात निवड झालेल्या शाळांची यादी :




  • जि. प. शाळा डोहळेपाडा, भिंवडी

  • जि. प. शाळा माणिवली, कल्याण

  • जि. प. शाळा कोलठण, मुरबाड

  • जि. प. शाळा शहापूर नं. १

  • जि. प. शाळा वाशिद नं. १, शहापूर

  • जि. प. शाळा काकडवाल, अंबरनाथ

  • बदलापूर नपा, कुळगाव

  • अंबरनाथ नपा ऑडिन्स फॅक्ट्री शाळा

  • भिवंडी मनपा अवचित पाडा उर्दू हायस्कूल

  • कल्याण मनपा तिसगाव शाळा नं. १८

  • नवी मुंबई नमपा आंबेडकर नगर शाळा नं. ५५

  • उल्हासनगर मनपा, शाळा नं. १२

  • ठाणे मनपा शाळा नं. ६२

  • मीरा-भाईंदर मनपा शाळा नं. २२

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच