‘पीएम श्री योजने’अंतर्गत ठाण्यातील प्रथम टप्प्यात १४ शाळांची निवड

  77

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पीएम श्री योजना’ राबली जात आहे. या योजने अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड प्रथम टप्प्यात झाली आहे. निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणांसाठी काम करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील ५ शाळा, महानगरपालिकातील ६ शाळा, नगरपालिका २, शहापुर नगरपंचायत १ अशा प्रकारे शाळांची निवड करण्यात आली आहे.



इमारत दुरुस्ती, नवीन वर्ग खोली, स्वच्छता गृह (मुली, मुले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी), संरक्षण भिंत, सौर ऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब इत्यादी सर्व भैतिक सुविधासाठी शाळेच्या गरजेनुसार शासनाकडे प्रस्ताव सादरिकरण करण्यासाठी कारवाई सुरू आहे.


पीएम श्री योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात निवड झालेल्या शाळांची यादी :




  • जि. प. शाळा डोहळेपाडा, भिंवडी

  • जि. प. शाळा माणिवली, कल्याण

  • जि. प. शाळा कोलठण, मुरबाड

  • जि. प. शाळा शहापूर नं. १

  • जि. प. शाळा वाशिद नं. १, शहापूर

  • जि. प. शाळा काकडवाल, अंबरनाथ

  • बदलापूर नपा, कुळगाव

  • अंबरनाथ नपा ऑडिन्स फॅक्ट्री शाळा

  • भिवंडी मनपा अवचित पाडा उर्दू हायस्कूल

  • कल्याण मनपा तिसगाव शाळा नं. १८

  • नवी मुंबई नमपा आंबेडकर नगर शाळा नं. ५५

  • उल्हासनगर मनपा, शाळा नं. १२

  • ठाणे मनपा शाळा नं. ६२

  • मीरा-भाईंदर मनपा शाळा नं. २२

Comments
Add Comment

कल्याणमध्ये कोकण वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आमरण उपोषण

चौदा वर्षे उलटूनही बाधित सदनिकाधारकांची फरफट थांबेना कल्याण : सुमारे चौदा वर्षे उलटूनही कल्याण पश्चिमेतील कोकण

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे