‘पीएम श्री योजने’अंतर्गत ठाण्यातील प्रथम टप्प्यात १४ शाळांची निवड

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पीएम श्री योजना’ राबली जात आहे. या योजने अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड प्रथम टप्प्यात झाली आहे. निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणांसाठी काम करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील ५ शाळा, महानगरपालिकातील ६ शाळा, नगरपालिका २, शहापुर नगरपंचायत १ अशा प्रकारे शाळांची निवड करण्यात आली आहे.



इमारत दुरुस्ती, नवीन वर्ग खोली, स्वच्छता गृह (मुली, मुले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी), संरक्षण भिंत, सौर ऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब इत्यादी सर्व भैतिक सुविधासाठी शाळेच्या गरजेनुसार शासनाकडे प्रस्ताव सादरिकरण करण्यासाठी कारवाई सुरू आहे.


पीएम श्री योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात निवड झालेल्या शाळांची यादी :




  • जि. प. शाळा डोहळेपाडा, भिंवडी

  • जि. प. शाळा माणिवली, कल्याण

  • जि. प. शाळा कोलठण, मुरबाड

  • जि. प. शाळा शहापूर नं. १

  • जि. प. शाळा वाशिद नं. १, शहापूर

  • जि. प. शाळा काकडवाल, अंबरनाथ

  • बदलापूर नपा, कुळगाव

  • अंबरनाथ नपा ऑडिन्स फॅक्ट्री शाळा

  • भिवंडी मनपा अवचित पाडा उर्दू हायस्कूल

  • कल्याण मनपा तिसगाव शाळा नं. १८

  • नवी मुंबई नमपा आंबेडकर नगर शाळा नं. ५५

  • उल्हासनगर मनपा, शाळा नं. १२

  • ठाणे मनपा शाळा नं. ६२

  • मीरा-भाईंदर मनपा शाळा नं. २२

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.