‘पवन’पाठोपाठ ‘आशा’ही पळाली; अद्यापही बेपत्ताच?

शोधाशोध करणा-या वनाधिकाऱ्यांची दमछाक झाली पण कुठेच नाही सापडली!


भोपाळ : नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या या चित्त्यांना कदाचित मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान आवडले नसावे. ‘ओबान’ उर्फ ‘पवन’ याने दोनदा कुनोच्या जंगलातून बाहेर धूम ठोकली होती. आता ‘आशा’ ही मादी चित्तादेखील उद्यानातून बाहेर पळाली आहे. त्यामुळे त्यांना शोधताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.


‘पवन’ हा दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या सीमेवर जाऊन पोहोचला. महत्प्रयासानंतर त्याला उद्यानात परत आणण्यात यश आले. आता मादी चित्ता ‘आशा’ कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर पडली आहे. गेल्या चार दिवसांपासून ती बेपत्ता आहे. शिवपूरी जिल्ह्यातील बैराड तहसीलच्या धोरिया गाझीगढच्या हिरवाईत तिचे शेवटचे ठिकाण होते. कुनो वनखात्याचे पथक आता त्याठिकाणी पोहोचले असून तिला लावलेल्या ‘रेडिओ कॉलर’च्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधला जात आहे.


घरातल्या पाळीव मांजराला घरापासून कितीही दूर अंतरावर अगदी मच्छीमार्केटमध्ये सोडले, तरी ते न चुकता रस्ता शोधत पुन्हा मालक गरीब असला तरी त्याच्या घरी येतेच. त्याचप्रमाणे वाघालाही हे नैसर्गिक वरदान मिळाले आहे. त्यामुळे त्याला एका जंगलातून उचलून दुसऱ्या जंगलात सोडले, तरी लांब पल्ला कापून तो पुन्हा मूळ अधिवासामध्ये परततोच. पण येथे तर सातासमुद्रापार आलेले हे वाघ कुठे जायचे अशा बुचकळ्यात पडलेले दिसून येतात.


विशेष म्हणजे, या चार दिवसात तिने एकदाही शिकार केलेली नाही, त्यामुळे वन खात्याचे अधिकारी चिंतेत आहेत. आधीच एका महिन्याच्या कालावधीत दोन चित्ते मृत्युमुखी पडले. २७ मार्चला नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता ‘साशा’ हिचा किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. तर २४ एप्रिलला ‘उदय’ या चित्त्याचा हृदय निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. काहीही खाल्ले नसल्याने ‘आशा’ची तब्येत बिघडू शकते आणि त्यामुळेच अधिकाऱ्यांमधील चिंता वाढली आहे.

Comments
Add Comment

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा