Adani Group Report : हा घ्या अदानीच्या २० हजार कोटींचा हिशोब!

  230

Adani Group Report : राहुल गांधी यांच्या २० हजार कोटी कुठून आले? या आरोपानंतर अदानी ग्रुपने मांडला चार वर्षांचा लेखाजोगा


मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करताना वारंवार उद्योगपती गौतम अदानी यांना 'बेनामी कंपन्यांकडून' मिळालेल्या २० हजार कोटी रुपयांचा हिशोब विचारत आहेत. आता खुद्द अदानी समूहाने आपला चार वर्षांचा हिशोब (Adani Group Report) मांडला आहे.


गौतम अदानी ग्रुपचे म्हणणे आहे की, २०१९ पासून ग्रुप कंपन्या सातत्याने त्यांचे स्टेक विकत आहेत. यातून $२.८७ अब्ज (सुमारे २३,५०० कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली आहे. यापैकी $२.५५ अब्ज (सुमारे २०,९०० कोटी रुपये) व्यवसाय विस्तारासाठी पुन्हा गुंतवले गेले आहेत. (Adani Group Report)


हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूह आधीच खूप अडचणीत आला आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. संसदेतील त्यांच्या एका भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सरकार गौतम अदानींना वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


अदानी समूहाचे म्हणणे आहे की, अबू धाबीची स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (आयएचसी) अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये $२.५९ अब्ज (सुमारे २१,००० कोटी) गुंतवणूक केली आहे. समूहाच्या प्रमोटर्सनी अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधील हिस्सेदारी विकून $२.७८ अब्ज (सुमारे २२,७०० कोटी रुपये) उभारले आहेत.


समुहाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, स्टेक विकून मिळालेली ही रक्कम नवीन व्यवसायाच्या विकासासाठी गुंतवण्यात आली होती. यासह प्रमोटर्सनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड सारख्या कंपन्यांच्या वाढीसाठी पुन्हा गुंतवणूक केली.


अदानी समूहाने आपल्या निवेदनात 'फायनान्शिअल टाईम्स'च्या वृत्ताचेही खंडन केले आहे. राहुल गांधी यांनी याच वृत्ताचा आधार घेत अदानींच्या बेनामी कंपन्यांमध्ये अचानक २० हजार कोटी रुपये आले कुठून? असा प्रश्न विचारला होता.


तसेच, अदानी ग्रुप शेअर बाजाराशी संबंधित कायद्यांचे पूर्णपणे पालन करत असल्याचेही अदानी ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )