नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कर्नाटकात १० मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल आणि १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. २० एप्रिलपासून नाव नोंदणी सुरू होईल. २१ ते २३ एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रांचा आढावा घेतला जाणार आहे. २४ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे.
निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, यापूर्वी एक प्रक्रिया सुरू केली होती. याअंतर्गत १ एप्रिल रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होईल, त्यांनाही मतदान करता येणार आहे. निष्पक्ष निवडणुका घेणं हे आमचं ध्येय आहे. कर्नाटकात ५.२२ कोटी मतदार आहेत. नवीन मतदार जोडण्यावरही आमचा भर आहे. ज्यांचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. राज्यात ८० वर्षे वयोगटातील १२.१५ लाखांहून अधिक मतदार आहेत. २७६ मतदार १०० वर्षांवरील आहेत. निवडणूक आयोग त्यांच्यासाठी विशेष मदत करेल. एकूण ५.२१ कोटी मतदार असून त्यापैकी २.६२ कोटी पुरुष आणि २.५९ कोटी महिला आहेत. तसेच राज्यात एकूण ४२,७५६ ट्रान्सजेंडर आहेत, त्यापैकी ४१,००० नोंदणीकृत आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ५८ हजारांहून अधिक मतदान केंद्रं असतील. त्यापैकी २८,८६६ शहरी मतदान केंद्रं असतील. १,३०० हून अधिक मतदान केंद्रं केवळ महिलांसाठी असणार आहेत. १०० बुथवर दिव्यांग कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकात यावेळीही मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात होणार आहे. मागच्या वेळी जेडीएस-काँग्रेस एकत्र होते. मात्र, यंदाच्या निवडणूकीत जेडीएस स्वतंत्र लढणार आहे.
कर्नाटकातील विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ २४ मे रोजी संपणार आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…