नवनीत राणांचे वडील फरार घोषित

  47

मुंबई : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केले आहे. तसेच न्यायालयाने त्या दोघांना एक हजार रुपयांचा दंडही बजावला आहे.

आज शिवडीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी सुरू असताना नवनीत राणा यांच्या वडिलांच्या नावाचा पुकारा करण्यात आला. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही त्यांना अद्याप अटक झालेली नाही आणि ते कोर्टात हजरही झाले नाहीत. आता हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या निवासस्थानी न्यायालयाची नोटीस लावण्यात येणार आहे. यामुळे कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे. आता कोर्टात पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार आहे.

नेमके प्रकरण काय?


शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणांच्या निवडीला आव्हान देत २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. उच्च न्यायालयाने जून २०२१ मध्ये नवनीत राणा यांना त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध मार्गाने मिळवल्याचा ठपका ठेवत जात प्रमाणपत्र सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना दोन लाखांचा दंडही बजावला होता. उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २२ जून २०२१ मध्ये स्थगिती दिली होती.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या