तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैगिंक अत्याचार आणि हत्या

  107

भिवंडी : नागाव परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या झाल्याच्या घटनेने भिवंडी पुन्हा एकदा हादरली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. शहरातील मागील चार दिवसात घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पुढील तपासासाठी पोलीस पथक तैनात केले आहे.


आई वडील मजुरी कामावर गेले असताना एका अज्ञात नराधमाने संधी साधत चिमुरडीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. परिसरात मुलीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी त्याच परिसरातील एक चाळीच्या पहिल्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.


दरम्यान शांतीनगर पोलिसांनी संपूर्ण परिसरात आरोपीचा शोध सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांची माहिती चाळ मालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सदर माहिती न देणाऱ्या चाळ मालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे .

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या