तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैगिंक अत्याचार आणि हत्या

  110

भिवंडी : नागाव परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या झाल्याच्या घटनेने भिवंडी पुन्हा एकदा हादरली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. शहरातील मागील चार दिवसात घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पुढील तपासासाठी पोलीस पथक तैनात केले आहे.


आई वडील मजुरी कामावर गेले असताना एका अज्ञात नराधमाने संधी साधत चिमुरडीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. परिसरात मुलीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी त्याच परिसरातील एक चाळीच्या पहिल्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.


दरम्यान शांतीनगर पोलिसांनी संपूर्ण परिसरात आरोपीचा शोध सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांची माहिती चाळ मालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सदर माहिती न देणाऱ्या चाळ मालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे .

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या