तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैगिंक अत्याचार आणि हत्या

भिवंडी : नागाव परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या झाल्याच्या घटनेने भिवंडी पुन्हा एकदा हादरली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. शहरातील मागील चार दिवसात घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पुढील तपासासाठी पोलीस पथक तैनात केले आहे.


आई वडील मजुरी कामावर गेले असताना एका अज्ञात नराधमाने संधी साधत चिमुरडीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. परिसरात मुलीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी त्याच परिसरातील एक चाळीच्या पहिल्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.


दरम्यान शांतीनगर पोलिसांनी संपूर्ण परिसरात आरोपीचा शोध सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांची माहिती चाळ मालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सदर माहिती न देणाऱ्या चाळ मालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे .

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.