तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैगिंक अत्याचार आणि हत्या

भिवंडी : नागाव परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या झाल्याच्या घटनेने भिवंडी पुन्हा एकदा हादरली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. शहरातील मागील चार दिवसात घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पुढील तपासासाठी पोलीस पथक तैनात केले आहे.


आई वडील मजुरी कामावर गेले असताना एका अज्ञात नराधमाने संधी साधत चिमुरडीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. परिसरात मुलीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी त्याच परिसरातील एक चाळीच्या पहिल्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.


दरम्यान शांतीनगर पोलिसांनी संपूर्ण परिसरात आरोपीचा शोध सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांची माहिती चाळ मालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सदर माहिती न देणाऱ्या चाळ मालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे .

Comments
Add Comment

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प