वांद्रे येथे बेस्ट बसला आग

मुंबई : कुलाब्याहुन सांताक्रूझकडे जाणाऱ्या सी ५१ क्रमांकाच्या बसला बांद्रा येथे शॉर्ट सर्किटमुळे आज दुपारी आग लागली. बस चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांनी वेळीच सावधानता दाखवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


बेस्टची सी ५१ ही बस इलेक्ट्रिक हाऊस ( कुलाबा आगार ) ते सांताक्रूझ आगार दरम्यान जात होती. मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या कंत्राटदाराची ही सीएनजी बस ७८७६ (एम एच ०१ डी आर - ७१३७) आज दुपारी सव्वा एक वाजता वांद्रे (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्ग येथील सिग्नल जवळ आली असता या बसच्या गियर बॉक्स जवळ स्पार्क होऊन शॉर्टसर्किटमुळे बस गाडीने पेट घेतला. यावेळी बस वाहक व चालकाने तातडीने बस गाडीतील २० ते २५ प्रवाशांना बस मधून खाली उतरवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.


सदर बस मधील कोणीही जखमी झाले नाही. आगीने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळाली असल्याचे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले. आग विझवल्यानंतर मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे अधिकारी व बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सदर बसची पाहणी केली.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०