आयसीसीचा २०२२चा एकदिवसीय संघ जाहीर

लंडन (वृत्तसंस्था) : आयसीसीने मंगळवारी २०२२चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय पुरुष संघ जाहीर केला आहे. आयसीसीच्या या ‘टीम ऑफ द ईयर’मध्ये भारताच्या श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.


वर्ष २०२२च्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही देशाच्या दोनपेक्षा जास्त खेळाडूंचा संघात समावेश नाही. वर्षभरातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी किंवा अष्टपैलू कामगिरीने प्रभावित करणाऱ्या खेळाडूंचा आयसीसीच्या या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष एकदिवसीय संघात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि भारतातील प्रत्येकी २ खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.


बाबर आझम (पाकिस्तान), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), शाई होप (वेस्ट इंडिज), श्रेयस अय्यर (भारत), टॉम लॅथम (यष्टीरक्षक, न्यूझीलंड), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), मेहंदी हसन (बांगलादेश), अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडिज), मोहम्मद सिराज (भारत), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), अॅडम झम्पा (ऑस्ट्रेलिया) असा आयसीसीचा २०२२चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय पुरुष संघ आहे.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.