आयसीसीचा २०२२चा एकदिवसीय संघ जाहीर

  133

लंडन (वृत्तसंस्था) : आयसीसीने मंगळवारी २०२२चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय पुरुष संघ जाहीर केला आहे. आयसीसीच्या या ‘टीम ऑफ द ईयर’मध्ये भारताच्या श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.


वर्ष २०२२च्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही देशाच्या दोनपेक्षा जास्त खेळाडूंचा संघात समावेश नाही. वर्षभरातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी किंवा अष्टपैलू कामगिरीने प्रभावित करणाऱ्या खेळाडूंचा आयसीसीच्या या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष एकदिवसीय संघात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि भारतातील प्रत्येकी २ खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.


बाबर आझम (पाकिस्तान), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), शाई होप (वेस्ट इंडिज), श्रेयस अय्यर (भारत), टॉम लॅथम (यष्टीरक्षक, न्यूझीलंड), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), मेहंदी हसन (बांगलादेश), अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडिज), मोहम्मद सिराज (भारत), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), अॅडम झम्पा (ऑस्ट्रेलिया) असा आयसीसीचा २०२२चा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय पुरुष संघ आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: पावसामुळे खेळ थांबला, इंग्लंड विजयापासून ३५ धावा दूर तर भारताला हव्यात ४ विकेट

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र