कॉल ड्रॉपने जिओ आणि एअरटेलचे यूजर त्रस्त

5G सर्विस येताच 4G नेटवर्क यूजर्सच्या कॉल ड्रॉपमध्ये वाढ


मुंबई : देशातील दोन खासगी कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलने देशात 5G नेटवर्क सुरू केले आहे. 5G नेटवर्क भारतात वेगाने पसरवले जात असताना अनेक शहरात आता 5G सर्विस मिळायला सुरुवात झाली आहे. Reliance Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या दररोज देशातील कोणत्या ना कोणत्या शहरात आपली 5G सर्विस सुरू करीत आहेत. मोबाइल यूजर्सला सुपरफास्ट 5G Internet Speed देण्याचा दावा करीत आहेत. परंतु, 5G नेटवर्क आल्यापासून 4G नेटवर्क मध्ये समस्या येत आहे.


सध्या 4जी सेवा खूपच खराब सुरू आहे. लो नेटवर्क कव्हरेज, स्लो इंटरनेट, तसेच कॉल ड्रॉप अशा अनेक समस्यांचा सामना अनेकांना करावा लागत आहे. देशात अनेक ठिकाणी 4G नेटवर्क मध्ये समस्या येत आहे. Jio आणि Airtel नंबरवर लो नेटवर्क, स्लो इंटरनेट तसेच कॉल ड्रॉपची समस्या पाहायला मिळत आहे. अनेक ग्राहकांकडून आरोप केला जात आहे की, 5G च्या चक्करमध्ये 4G सेवा खराब होत आहे.


रिलायन्स जिओ आणि एअरटेल कस्टमर्सला खराब 4जी सेवेचा सामना करावा लागत आहे. याचा मागील आठवड्यात मोबाइल सेवेवर खूप परिणाम झाला होता. यूजर्सला नेटवर्क आणि इंटरनेट दोन्हीच्या क्वॉलिटीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मोबाइल मध्ये सिग्नल खूप कमी येत आहे. अनेकदा सिग्नल असूनही इंटरनेट डेटा कनेक्टिविटी मिळत नाही.


डिसेंबर २०२२ पासून Reliance Jio आणि Airtel कस्टमर्सला कॉल ड्रॉपची समस्या येत आहे. आपल्या स्वतःचा अनुभव विचारल्यानंतर अनेकांनी नंबरवर कॉल करण्यास वेळ लागत असल्याचे म्हटले आहे. अनेकांना कॉल कनेक्ट करण्यास अडचण येत आहे. जर फोन लागला तर मध्येच कॉल कट होत आहे. हा कॉल ड्रॉपचा प्रोब्लेम वारंवार येत आहे. ज्यामुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत. फोनवर बोलत असताना व्हाइस क्वॉलिटी सुद्धा व्यवस्थित येत नाही.


लो नेटवर्क कव्हरेज व कॉल ड्रॉप सारखी समस्या सोबत मोबाइल यूजर्सला इंटरनेट संबंधी समस्या येत आहे. 4G रिचार्ज प्लान असूनही स्मार्टफोन वर 3G हून कमी इंटरनेट स्पीड मिळत आहे. फोनमध्ये इंटरनेट कनेक्टेड दिसत असले तर ब्राउजर ओपन केल्यास साइट ओपन होण्यास उशीर लागत आहे. काही यूजर्सला तर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी UPI Apps सुद्धा ओपन होण्यास अडचण येत आहे.


वारंवार नेटवर्क मध्ये समस्या येत आहे. ही समस्या अनेक परिसरात येत आहे. त्रस्त झालेले यूजर्सला कळत नाही की, या समस्येनंतर काय करायचे. जिओ आणि एअरटेल सारख्या टेलिकॉम ऑपरेटर आपल्या नेटवर्कला 5जी वर अपग्रेड करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रक्रियामुळे कंपनीचे 4जी नेटवर्कमध्ये समस्या येत आहे. सर्वात आधी, सर्वात जास्त आणि सर्वात फास्ट 5जी सर्विस देण्याच्या प्रयत्नात ही समस्या येत आहे का, याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या