Accident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार

नाशिक : नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक रोडपासून काही अंतरावर राजगुरू नगर-नाशिक या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला झालेल्या विचित्र अपघातात (Accident in Nashik) एसटी बस जळून खाक झाली. तर या अपघातात २ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.


एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने शिंदे पळसे गावाच्या हद्दीत बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक आहे. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली असून नाशिक शहरापासून केवळ ६ ते ७ किमी अंतरावरील हा अपघात झाला आहे.


अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून खाक झाली. या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाली असून आठ ते दहा लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून बघ्यांचीही गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.


या बस अपघातात हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेर, रुपाली सचिन दिवटे, अकोले, समृद्धी सचिन दिवटे, सईदा इनामदार, संगमनेर, मुस्तफा शेख, संगमनेर, नसमा जहाँगिरदार, संगमनेर, औवेस अहमद, धारावी मुंबई, सिताराम देवराम कुरणे, सिकर हे प्रवासी जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे