Accident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार

  151

नाशिक : नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक रोडपासून काही अंतरावर राजगुरू नगर-नाशिक या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला झालेल्या विचित्र अपघातात (Accident in Nashik) एसटी बस जळून खाक झाली. तर या अपघातात २ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.


एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने शिंदे पळसे गावाच्या हद्दीत बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक आहे. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली असून नाशिक शहरापासून केवळ ६ ते ७ किमी अंतरावरील हा अपघात झाला आहे.


अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून खाक झाली. या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाली असून आठ ते दहा लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून बघ्यांचीही गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.


या बस अपघातात हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेर, रुपाली सचिन दिवटे, अकोले, समृद्धी सचिन दिवटे, सईदा इनामदार, संगमनेर, मुस्तफा शेख, संगमनेर, नसमा जहाँगिरदार, संगमनेर, औवेस अहमद, धारावी मुंबई, सिताराम देवराम कुरणे, सिकर हे प्रवासी जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार