Jode Maro : राहुल गांधींविरोधात राज्यात जोडे मारा आंदोलन

  183

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे तीव्र पडसाद


मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून बाळासाहेबांची शिवसेना तसेच भाजप आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी त्यांनी (Jode Maro) आंदोलने केली. (jode maro movement in the state against Rahul Gandhi) काही ठिकाणी राहुल गांधींविरुद्ध जोडे मारा आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आता आंदोलन करणार आहे. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनीही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार केली असून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.नाशिकमध्येही राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजयुमोचे आंदोलन… केले. ठाणे आणि डोंबिवली येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोडे मारा आंदोलन केले.


डोंबिवलीत बाळासाहेबांची शिवसेनेचे जोडो मारो आंदोलन


भारत जोडो अभियान अंतर्गत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे उद्गार काढले ते अतिशय चुकीचे आणि निषेधार्ह आहेत. बाळासाहेबांची शिवसेना असे वक्तव्य कधीही खपवू घेणार नाही. आता आम्ही फक्त राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले आणि निषेध केला यानंतर असे उद्गार काढले, तर आम्ही उग्र आंदोलन करू, असे वक्तव्य बाळासाहेबांची शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी डोंबिवलीत केले. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमानंतर झालेल्या जोडो मारो आंदोलन प्रसंगी मोरे बोलत होते.


बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे प्रथम स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध मोर्चा काढला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निषेध नोंदविला. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देऊन गांधी यांच्या फोटोला कोल्हापुरी जोडे मारले. राहुल गांधी हाय-हाय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो...! अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर दणाणून गेला होता.


ठाण्यात आंदोलन


राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ टेंभीनाका येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले.


राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचे पत्र वाचलेले नाही : अॅड. आशीष शेलार


माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी लिहिलेल्या एका पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांनी भारताचा सुपुत्र म्हटले असून त्यांचा उल्लेख वीर सावरकर असा केला आहे. तसेच सावरकर यांनी ब्रिटिशांविरोधात अतिशय धाडसी युद्ध केले, त्याची नोंद इतिहासात होईल. असे नमूद केले आहे. राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचे पत्र वाचलेले नाही. त्यामुळे त्यांचे विधान हे बेअक्कलपणाचे आहे. म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया अॅड आशीष शेलार यांनी व्यक्त केली आहे.


अवमान प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याविरोधात दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वा. सावरकर यांचे नातू आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी गुरुवारी दुपारी लेखी तक्रार केली. यावेळी पोलीस ठाण्यात त्यांच्यासह खासदार राहुल शेवाळे देखील उपस्थित होते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या