Thackeray-Shinde clash : ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम मारहाण; राजन विचारेंनाही धक्काबुक्की

ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर भागात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद (Thackeray-Shinde clash) झाला.


या वादात (Thackeray-Shinde clash) ठाकरे गटाच्या दोन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी दोन्ही गटांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


मारहाण झाली त्यावेळेस (Thackeray-Shinde clash) घटनास्थळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील उपस्थित होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किसननगर ही राजकीय कर्मभूमी आहे. येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे हे देखील उपस्थित होते. याच दरम्यान शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जाणकर त्याठिकाणी आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही गटात वाद झाला. या वादात ठाकरे गटाचे दोन पदाधिकारी जखमी झाले. यावेळी राजन विचारेंनाही धक्काबुक्की करण्यात आली. राजन विचारे यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात घटनास्थळाहून बाहेर काढण्यात आले. ही मारहाण कॅमेऱ्यांतही कैद झाली आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली.


त्यानंतर राजन विचारे हे श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे देखील त्याठिकाणी आले. दोन्ही गटाने एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या. त्यानंतर दोन्ही गटाच्या एकमेकांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस ठाण्याबाहेरही दोन्ही गट समोरासमोर आल्याने पोलिसांनी दोन्ही गटावर लाठीमार केला आणि जमाव पांगवला.


घटनेनंतर ठाकरे गटाकडून समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात गुंडाराज सुरू आहे का? असा आरोप ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे.


मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परांवर आरोप केले आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले की, काल किसननगर येथे ठाकरे गटाचा मेळावा सुरू असतानाच शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी एकदम घुसखोरी करत आमच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यासाठी बाहेरील जिल्ह्यातून १०० माणसं आणली होती. ठाकरे गटावर दबाव टाकण्यासाठीच असा प्रयत्न केला जात आहे.


तर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले की, काल किसननगर येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातून आमच्या नगरसेवकाला खासदार राजन विचारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाकलून लावले. वाढदिवस सुरू असतानाच आमच्या नगरसेवकाला तु इथे कशाला आलास? असे विचारत त्याला धक्काबुक्की करत बाहेर काढले. त्यामुळे नंतर वाद झाला. याची सुरूवात ठाकरे गटानेच केली, असे म्हस्के यांनी सांगितले.


https://twitter.com/OnlineTheWiki/status/1592412365924204546

अन्य बातम्या...


ठाणे जिल्ह्यातूनच ८ कोटींच्या बनावट नोटा जप्त


ठाण्यातील विवियाना मॉल राडाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


दुर्गाडी येथे होणार नौदल टी-८० युद्धनौकेचे स्मारक

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा