Nitesh Rane : मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार; मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना डिवचले

'बुरखेवाली' महापौर होण्याची भीती वाटत नाही का?


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. "मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार," असे ठामपणे सांगत त्यांनी ठाकरेंच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे.



हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी?


नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, "जितकी मिरची ठाकरे गटाला उत्तर भारतीय महापौराच्या शक्यतेवरून लागली, तितकी मिरची 'बुरखेवाली महापौर बनेल' या शक्यतेची का लागली नाही?" यावरून त्यांनी ठाकरे गट हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. राणे पुढे म्हणाले की, "यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते."



महापौर आमचाच आणि हिंदूच!


मुंबईच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरताना मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, मुंबईवर केवळ मराठी आणि हिंदूचाच अधिकार असेल. "मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार आणि तो आमचाच (महायुतीचा) होणार!" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'मुंबई महादेव' असा उल्लेख करत त्यांनी आपल्या ट्विटचा शेवट केला, ज्यातून त्यांनी धार्मिक आणि प्रादेशिक अस्मितेचा संदेश दिला आहे.

Comments
Add Comment

Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या; म्हणाल्या, न घाबरता 'ती' भूमिका...महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वरून वाद पेटला!

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू