संभाजीराजेंपाठोपाठ संभाजी ब्रिगेडही आक्रमक

  83

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच यापुढे चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखवला तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता संभाजी ब्रिगेड संघटनेकडूनही ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांना तीव्र शब्दांत इशारा देण्यात आला आहे.


“हर हर महादेव चित्रपट दाखवणे थांबवा. चित्रपटगृहात पडदे फाटल्याशिवाय थेटर मालकांना अक्कल येणार नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. इतिहासाची मोडतोड करून ‘हर हर महादेव…’ चित्रपट तयार केलाय”, असा घणाघात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला.


“वेडात मराठे वीर दौडले सात… हा सुद्धा चित्रपट शेंबडी आणि फॉल्टी पोरांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे. अकराळ विक्राळा मावळे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासातील हरामखोरी थांबवा”, असा हल्लाबोल संतोष शिंदेंनी केला.


“सुबोध भावे, अभिजीत देशपांडे, अक्षय कुमार किंवा महेश मांजरेकर… छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तुत्वान इतिहास बदनाम करू नका. गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. चित्रपटगृहाचे पडदे फाडल्याशिवाय तुम्हाला अक्कल येऊ येणार नाही, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला. तसेच सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी”, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.


“मला आज सांगायचंय की, ऐतिहासिक सिनेमे निघतायेत ते कौतुकास्पद आहे. पण चित्रपटाच्या स्वातंत्र्यानुसार इतिहासातील घडामोडींची मोडतोड केली जातेय. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला चालणार नाही. हर हर महादेव हा चित्रपट जो प्रदर्शित झालाया त्यात इतिहासाची प्रचंड मोडतोड करण्यात आलीय”, अशी भूमिका संभाजीराजेंनी मांडली.


“जर यांनी असेच चित्रपट काढायला घेतले तर गाठ संभाजी छत्रपतीशी आहे. काढून तर बघुदेत. नाही आडवा आलो तर बघा. मीच आडवायला येणार. आमचा या घराण्यात जन्म होऊन उपयोग काय? वेळप्रसंग काहीही झालं तरी चालेल. पण असा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणत असाल तर याद राखून ठेवा”, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित