मिरचीच्या दरात ६० ते ७० टक्के वाढ

Share

ठाणे (प्रतिनिधी) : हवामानाच्या लहरीपणाचा फटका मिरचीच्या उत्पादनाला बसला असून तुटवडा निर्माण झाल्याने भाव प्रति क्विटल ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने सध्या मिरचीच्या भावात ६० ते ७० टक्के दरवाढ झाली आहे. ऐन पीक हाती येण्याच्या काळातच अवकाळी पावसाने उत्पादन घटले. परिणामी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भाव वाढ झाली होती. त्यात पुन्हा वाढ झाली आहे. सततची इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी लावल्याने मोठी भाव वाढ झाली आहे. परिणामी सर्वसामान्यांनी जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच वाढत्या महागाईचा फटका लाल मिरचीलाही बसला आहे.

वर्षभर साठवणीसाठी अनेकजण नोव्हेंबर, डिसेंबरपासून लाल मिरचीचा मसाला तयार करून ठेवतात. काहीजण प्रत्येक महिन्याला करतात. मात्र, सहा महिन्यातच मिरचीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. देशात आंध्रप्रदेशात सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक, मध्य प्रदेशात, तेलंगणा, कर्नाटकात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्याशिवाय आसाम आणि पश्चिम बंगाल, पंजाब राज्यांमध्ये उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात खानदेश, कोल्हापूर येथे उत्पादन घेतले जाते. हिरवी तिखट मिरची १२० ते १६० रुपये किलो दराने विक्रीस आहे.

गेल्या वर्षी मिरचीला चांगले भाव मिळाल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले. परिणामी, मिरचीचे भाव घसरले. त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस, वादळाने आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील मिरचीचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले. नोव्हेंबरपासून हंगामास सुरुवात होते. तेव्हापासून दरवाढीला सुरुवात झाली. नोव्हेंबरमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेशातून तर आंध्र प्रदेश तेलंगणातून डिसेंबरमध्ये मिरचीची बाजारात येते. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने मिरचीचा तुटवडा निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

21 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

1 hour ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

2 hours ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

3 hours ago