वन विभागाने छापा मारत ७ कासव केले जप्त

कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवलीत कासव तस्करीत वाढ झाली असून वन विभागाने दोन दुकानांवर छापा मारत ७ कासव जप्त केले आहेत. कल्याण पश्चिम परिसरात संजय गजधाने यांच्या पाळीव प्राण्याच्या दुकानावर धाड मारून ३ इंडियन टेंट टर्टल प्रजातीच्या कासव, तर कल्याण पूर्वेत अजय शर्मा यांच्या दुकानावर धाड मारून ४ भारतीय स्टार कासवांची सुटका केली आहे.


कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून कासव खरेदी विक्रीच्या घटना वाढल्याने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कासवाची तस्करी केली जात आहे. कासवाला जास्त मागणी असल्याने दुकानदार मोठ्या प्रमाणात कासव ठेवून विक्री करत आहेत. अशा दुकानदारांच्या विरोधात कल्याण वन विभागाने कंबर कसली असून या दुकांदारावर छापे मारत कारवाई सुरू केली आहे. वनविभागाने नुकत्याच दोन कारवाईत सात कासव जप्त करण्यात आले आहे.


यात कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या संजय गजधाने ह्यांच्या पाळीव प्राण्याच्या दुकानावर धाड मारून ३ इंडियन टेंट टर्टल प्रजातीच्या कासवांची, तर कल्याण पूर्वेत अजय शर्मा यांच्या दुकानावर धाड मारून ४ भारतीय स्टार कासवांची सुटका करत दोन्ही दुकान चालकाच्या विरोधात वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कासव खरेदी करणे गुन्हा असून अशा प्रकारे कुठल्याही प्राण्याची खरेदी विक्री करू नये, असे आवाहन वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने यांनी केले आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच