व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी ८ दिवस घरात डांबून ठेवले, सुटकेसाठी पाच लाखांची खंडणी

डोंबिवली (वार्ताहर) : व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी डोंबिवलीकरास मारझोड केल्यानंतर आठवडाभर घरात डांबून ठेवणाऱ्या माटुंग्याच्या खंडणीबहाद्दराला टिळकनगर पोलिसांनी डोंबिवलीतील एका हॉटेलातून नाट्यमयरित्या बेड्या ठोकल्या. सुटकेसाठी त्याच्या पत्नीकडे रेल्वेत नोकरी करणाऱ्या या खंडणीबहाद्दराने ५ लाखांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना हा अपहरणकर्ता खंडणीबहाद्दर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अलगद सापडला.


अजय पाडुरंग जाधव (५२) असे अटक करण्यात आलेल्या खंडणीबहाद्दराचे नाव असून रविवारी कल्याणला सुट्टीच्या कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात ऋचा व्यापारी (५५) या महिलेने शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन पती अतुल अनंत व्यापारी (५६) यांना ९ जुलै रोजी मुंबईत राहणाऱ्या अजय जाधव याने मारहाण केली. त्यानंतर आपल्या पतीचे अपहरण करून त्यांना माटुंग्यातील एका बंदिस्त खोलीत डांबून ठेवले. पतीची सुटका करायची असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंद केला.


अपहरणकर्ता अजय जाधव याने फोनवरून केलेल्या संभाषणानुसार ऋचा व्यापारी यांना ५ लाख रुपये घेऊन येण्यास एका हॉटेलात बोलावले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वपोनि अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग पिठे यांच्या नेतृत्वाखाली अपहरणकर्त्या खंडणीबहाद्दराला रंगेहाथ पकडण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडला असलेल्या एका हॉटेलात सापळा लावला. तेथे ५ लाखांची रोकड दिल्यानंतर अजय जाधव याने त्याच्या ताब्यातील अतुल व्यापारी यांची सुटका केली. मात्र पोलिसांनी ऋचा व्यापारी यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना अजय जाधव याला रंगेहाथ पकडले.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये