व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी ८ दिवस घरात डांबून ठेवले, सुटकेसाठी पाच लाखांची खंडणी

  104

डोंबिवली (वार्ताहर) : व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी डोंबिवलीकरास मारझोड केल्यानंतर आठवडाभर घरात डांबून ठेवणाऱ्या माटुंग्याच्या खंडणीबहाद्दराला टिळकनगर पोलिसांनी डोंबिवलीतील एका हॉटेलातून नाट्यमयरित्या बेड्या ठोकल्या. सुटकेसाठी त्याच्या पत्नीकडे रेल्वेत नोकरी करणाऱ्या या खंडणीबहाद्दराने ५ लाखांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना हा अपहरणकर्ता खंडणीबहाद्दर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अलगद सापडला.


अजय पाडुरंग जाधव (५२) असे अटक करण्यात आलेल्या खंडणीबहाद्दराचे नाव असून रविवारी कल्याणला सुट्टीच्या कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात ऋचा व्यापारी (५५) या महिलेने शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन पती अतुल अनंत व्यापारी (५६) यांना ९ जुलै रोजी मुंबईत राहणाऱ्या अजय जाधव याने मारहाण केली. त्यानंतर आपल्या पतीचे अपहरण करून त्यांना माटुंग्यातील एका बंदिस्त खोलीत डांबून ठेवले. पतीची सुटका करायची असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंद केला.


अपहरणकर्ता अजय जाधव याने फोनवरून केलेल्या संभाषणानुसार ऋचा व्यापारी यांना ५ लाख रुपये घेऊन येण्यास एका हॉटेलात बोलावले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वपोनि अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग पिठे यांच्या नेतृत्वाखाली अपहरणकर्त्या खंडणीबहाद्दराला रंगेहाथ पकडण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडला असलेल्या एका हॉटेलात सापळा लावला. तेथे ५ लाखांची रोकड दिल्यानंतर अजय जाधव याने त्याच्या ताब्यातील अतुल व्यापारी यांची सुटका केली. मात्र पोलिसांनी ऋचा व्यापारी यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना अजय जाधव याला रंगेहाथ पकडले.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या