लोणावळ्यात पर्यटनस्थळी पर्यटकांना पाचनंतर प्रवेश बंदी पोलिसांचा निर्णय

  81

लोणावळा (वार्ताहर) : लोणावळ्यात पर्यटनस्थळी पाच नंतर पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी लोणावळा पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. विशेषत: वीकेंडमध्ये ही गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवताना दिसू लागला आहे. त्यामुळे ही गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सायंकाळी पाचनंतर येथे पर्यटकांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.


दरम्यान मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेले डोंगर धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. हिरवागार परिसर, धबधबे, रिमझिम पाऊस याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यातून पर्यटकांची हजेरी आणि खास पसंती ही विशेषत: लोणावळ्याला दिलेली दिसून येते आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटकांना हा आनंद घेता आलेला नाही. पर्यटकांच्या भेटीमुळे ही संख्या वीकेंडला तर लाखोंच्या घरात देखील जाताना दिसून येते. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते.


वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षा विहाराच्या निमित्ताने हजारो पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट इथे दाखल होतात. नुकतेच मुंबईतील एका पर्यटकाचा भुशी धरणात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या