लोणावळ्यात पर्यटनस्थळी पर्यटकांना पाचनंतर प्रवेश बंदी पोलिसांचा निर्णय

लोणावळा (वार्ताहर) : लोणावळ्यात पर्यटनस्थळी पाच नंतर पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी लोणावळा पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. विशेषत: वीकेंडमध्ये ही गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवताना दिसू लागला आहे. त्यामुळे ही गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सायंकाळी पाचनंतर येथे पर्यटकांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.


दरम्यान मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेले डोंगर धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. हिरवागार परिसर, धबधबे, रिमझिम पाऊस याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यातून पर्यटकांची हजेरी आणि खास पसंती ही विशेषत: लोणावळ्याला दिलेली दिसून येते आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटकांना हा आनंद घेता आलेला नाही. पर्यटकांच्या भेटीमुळे ही संख्या वीकेंडला तर लाखोंच्या घरात देखील जाताना दिसून येते. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते.


वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षा विहाराच्या निमित्ताने हजारो पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट इथे दाखल होतात. नुकतेच मुंबईतील एका पर्यटकाचा भुशी धरणात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण