लोणावळ्यात पर्यटनस्थळी पर्यटकांना पाचनंतर प्रवेश बंदी पोलिसांचा निर्णय

लोणावळा (वार्ताहर) : लोणावळ्यात पर्यटनस्थळी पाच नंतर पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी लोणावळा पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. विशेषत: वीकेंडमध्ये ही गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवताना दिसू लागला आहे. त्यामुळे ही गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सायंकाळी पाचनंतर येथे पर्यटकांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.


दरम्यान मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेले डोंगर धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. हिरवागार परिसर, धबधबे, रिमझिम पाऊस याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यातून पर्यटकांची हजेरी आणि खास पसंती ही विशेषत: लोणावळ्याला दिलेली दिसून येते आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटकांना हा आनंद घेता आलेला नाही. पर्यटकांच्या भेटीमुळे ही संख्या वीकेंडला तर लाखोंच्या घरात देखील जाताना दिसून येते. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते.


वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षा विहाराच्या निमित्ताने हजारो पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट इथे दाखल होतात. नुकतेच मुंबईतील एका पर्यटकाचा भुशी धरणात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

पुण्यात पसरला विषारी धूर, ५ विद्यार्थी रुग्णालयात; २० हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजला सुट्टी, एक कंपनी बंद

पुणे : पुण्यात लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात आहे. या

Nagpur Blast : नागपूर कारखाना स्फोट; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला, आणि

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या