सप्तशृंगी मंदिर तब्बल ४५ दिवस राहणार बंद

नाशिक (हिं.स.) : श्री भगवती स्वरुप व मूर्ती देखभाल संदर्भिय पुर्तता करण्यासाठी २१ जुलै ते ५ सप्टेंबर २०२२ या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी गड वणी येथील श्री भगवती मंदिर बंद राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आलेली आहे.


वर्ष २०१२-१३ पासून श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरु असून, सद्यस्थितीत कार्यरत असलेले अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी पवई (बॉम्बे) यांसह मे. अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत संदर्भिय पुर्ततेकामी तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करुन श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल संबंधीत पुर्तता होणे दृष्टीने अंतिम निर्णय घेतला आहे.


त्यानुसार श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल अनुषंगीक पुर्ततेसाठी गुरुवार २१ जुलै पासून पुढील ४५ दिवस श्री भगवती मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी संपुर्णत: बंद राहणार आहे. मात्र विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालय नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे. तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद, भक्तनिवास व इतर अनुषंगीक सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद