सप्तशृंगी मंदिर तब्बल ४५ दिवस राहणार बंद

नाशिक (हिं.स.) : श्री भगवती स्वरुप व मूर्ती देखभाल संदर्भिय पुर्तता करण्यासाठी २१ जुलै ते ५ सप्टेंबर २०२२ या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी गड वणी येथील श्री भगवती मंदिर बंद राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आलेली आहे.


वर्ष २०१२-१३ पासून श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरु असून, सद्यस्थितीत कार्यरत असलेले अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी पवई (बॉम्बे) यांसह मे. अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत संदर्भिय पुर्ततेकामी तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करुन श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल संबंधीत पुर्तता होणे दृष्टीने अंतिम निर्णय घेतला आहे.


त्यानुसार श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल अनुषंगीक पुर्ततेसाठी गुरुवार २१ जुलै पासून पुढील ४५ दिवस श्री भगवती मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी संपुर्णत: बंद राहणार आहे. मात्र विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालय नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे. तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद, भक्तनिवास व इतर अनुषंगीक सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे