सोलापूर : संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी अकलूजमध्ये दाखल झाली. अकलूजमध्ये पालखी दाखल होताच, पालखीचे रिंगण पार पडले. जवळपास दोन वर्षानंतर हा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
यावर्षीचे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले रिंगण आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचे तिसरे रिंगण आहे. अकलूजमध्ये आज ११ वाजता भव्य दिव्य रिंगण सोहळा संपन्न झाला. वारकरी आणि अकलूजकर रिंगण सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते. तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे सराटी येथील निरा नदीत स्नान झाल्यानंतर पालखी अकलूज नगरीत पोहचली.
तुकाराम महाराजांच्या पालखीने अकलूजमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत या पालखीचे स्वागत करण्यात आले. अकलूजच्या मैदानात रिंगण सोहळा पार पडला. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती. आजचे तिसरे रिंगण अकलूज मधील माने विद्यालयात झाले.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…