विश्वासदर्शक ठराव आज जबरदस्त बहुमताने जिंकणार : फडणवीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातले युती सरकार जबरदस्त बहुमताने जिंकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांनी आपला अध्यक्षपदाचा उमेदवार बहुमताने निवडून आल्यामुळे फडणवीस यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांची आणखी काही मते खेचतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी लागणारा इम्पिरिकल डेटा अचूक करताना तो लवकरात लवकर न्यायालयात सादर होईल हे पाहिले जाईल, असेही ते म्हणाले.


सरसकट निर्णय बदलणार नाही


ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय सरसकट बदलणार नाही. मात्र ज्या निर्णयावर आमचा आक्षेप असेल आणि जे निर्णय जनतेसाठी योग्य नसतील ते बदलले जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.


मेट्रो कारशेड आरेतच


आरे येथे आता वृक्षतोड होणार नाही. जी झाडे तोडायची होती, ती सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनेच तोडली आहेत. तेथे २५ टक्के कामही झाले आहे. उरलेले काम झाले, तर वर्षभरात ती सुरू होऊ शकेल. तेथे चाललेल्या पर्यावरणवाद्यांची समजूत काढली जाईल. तेथे होत असलेल्या आंदोलनापैकी निम्मे आंदोलन पुरस्कृत आहे, असेही त्यांनी सांगितले. कांजूर मार्गच्या जागेचा निर्णय न्यायालयातून कधी येईल हे ठाऊक नाही. आला तरी तो कोणाच्या बाजूने असेल ते माहीत नाही. त्यानंतर चार वर्षे तेथे काम चालेल, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी