भुजबळांनी सिपेट प्रकल्पाला खिळ घालण्याचा प्रयत्न केला

  91

नाशिक (प्रतिनिधी) : दर वर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करणाऱ्या ‘सिपेट’ या केंद्र शासनाच्या प्रकल्पास तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच विरोध केल्याचे समोर आले आहे. ‘सिपेट’ प्रकल्पासाठी शेकडो झाडांची कत्तल होणार असल्याचा बाऊ करत भुजबळ यांनी विकासाला खोडा घालण्याचा प्रयत्न केला.


सदर प्रकल्प गोवर्धन शिवारातील प्रास्तावित जागेवर होऊ नये, असे पत्र भुजबळ यांनी शासनाला देत विकासाला विरोध केल्याने त्यांच्या विरोधात शहरवासियांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.


भुजबळ यांचा हा सर्व खटाटोप पर्यावरणाच्या संर्वधानासाठी नव्हे, तर प्रस्तावित ‘सिपेट’ प्रकल्पालगत शेजारच्या जागेत असलेल्या त्यांच्या शैक्षणिक संस्थेचे महत्त्व कमी होऊ नये व विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संस्थेच्या बाजूच्या जागेत असलेल्या ग्रिनरीची शेड तशीच कायम रहावी यासाठी केल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. केंद्राने ‘सिपेट’ प्रकल्पासाठी पनवेलची निवड केली होती. सदर प्रकल्प पनवेल येथे होणार होता. मात्र ३ वर्षांच्या प्रयत्नानंतरही प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होऊ न शकल्याने प्रकल्प राज्याबाहेर नेण्याचा निर्णय केंद्राच्या विचाराधिन होता.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत