जीवे मारण्याची धमकी देऊन रोकडसह कार बळजबरीने पळविली

  81

नाशिक (प्रतिनिधी) : चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत एका इसमाकडून २० लाख रुपयांची रोकड व कार बळजबरीने लुटून नेणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत नरेंद्र बाळू पवार (रा. अंतरिक्ष अपार्टमेंट, खुटवडनगर, अंबड) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की फिर्यादी यांना २९ जून रोजी सातपूर येथील सकाळ सर्कलजवळ अज्ञात आरोपीने भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर अज्ञात इसमाने पवार यांना जबरदस्तीने इर्टिगा कारमध्ये बसविले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर तुझा गेम करू, अशी धमकी देत उड्डाणपुलावरून घोटीकडे नेले.


यादरम्यान फिर्यादी पवार यांचे औरंगाबाद येथे राहणारे मित्र विजय खरात यांना फोन करून २० लाख रुपये जमा करून पवार यांच्यासोबत गाडीत बसलेल्या इतर इसमांच्या सांगण्यावरून औरंगाबाद येथील सिडको बस स्टॅण्डजवळील इसमास देण्यास सांगितले. त्यानुसार विजय खरात यांनी त्या व्यक्तीस २० लाख रुपये रोख स्वरूपात दिल्यानंतर पुन्हा फिर्यादी पवार यांना गाडीत बसवून आणखी पैशाच्या प्रलोभनाने त्यांच्या घरापर्यंत घेऊन गेला.


त्यावेळी घराबाहेर उभी असलेली पवार यांची १० लाख रुपये किमतीची एमएच ४८ एटी ७६८९ या क्रमांकाची सिल्व्हर रंगाची ऑडिका कार, दोन मोबाइल व फिर्यादीच्या मित्राने रोख स्वरूपात दिलेले २० लाख असा एकूण ३० लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात व्यक्तीने बळजबरीने लुटून नेला. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम