मुंबई (हिं.स.) : रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली. आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रिलायन्स जिओ संचालक मंडळाची सोमवारी रोजी बैठक झाली. या बैठकीत संचालक मंडळाने आकाश अंबानी यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
याशिवाय बैठकीत अन्य काही जणांकडे जबाबदा-या सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी पंकज मोहन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज मोहन पुढील पाच वर्षे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहे. रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही चौधरी यांची कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…