दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचे सरकार : दानवे

जालना (प्रतिनिधी) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. यादरम्यान या सत्तानाट्यात भाजपने उडी घेतली आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोरच येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा केला आहे.


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दानवे उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, ‘तुम्ही जिल्ह्यात आमदार, खासदारांना त्यांचा मान द्या, राज्यात गोंधळ सुरू आहे म्हणून हे म्हणत नाही. आमचं उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसते, अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल लक्षात येत नाही? सकाळी फोन करून सांगतात, ही चांगली पद्धत नाही. सरकार येतील सरकार जातील, आम्ही विरोधी पक्षात असलेले चांगले आहे, असे बोलता येते. दोन-तीन दिवसांत हेही बंद होणार आहे, टोपेसाहेब लक्ष ठेवा’, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.


त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. तसेच दोन-तीन दिवसांत भाजपचे सरकार राज्यात येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. शिंदे यांच्या बंडानंतर भाजपने याच्याशी आमचा संबंध नसल्याचे सांगत ही शिवसेनेतील अंतर्गत गोष्ट असल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,