पत्रकार भवन गैरव्यवहार; गुन्हे दाखल करण्याचे आदेश

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा पत्रकार संघाला शासनाने दिलेल्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार राजन शर्मा यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.


ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी तसेच शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता. तेव्हा कारवाई टाळण्यासाठी शर्तभंग कारवाईस स्थगिती आदेश घेणाऱ्या ठेकेदार शर्मा बंधूंचे अनेक कारनामे उघड होण्याची चर्चा रंगली आहे.


ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानालगत पत्रकार भवनाची भव्य वास्तू उभारली होती. १९८८ मध्ये शासनाने दिलेल्या भूखंडावर जुन्या पत्रकार संघाशी करार करून ठेकेदार राजन शर्मा व किशोर शर्मा या बंधूंनी इमारत उभारून पत्रकार संघाला जागा न देता गाळे व हॉलची परस्पर विक्री केली. यासंदर्भात, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे जिल्हा पत्रकार संघ गेली १२ वर्षे आवाज उठवून पाठपुरावा करीत आहेत. शासनाने ९ जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशात जिल्हा प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश दिले.


उपविभागीय अधिकाऱ्यांनीही शर्तभंग झाल्याचे नमूद केले असून महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने दिलेली स्थगितीची कालमर्यादा फक्त सहा महिन्यांपर्यंत लागू राहते. अपवादात्मक परिस्थितीत स्थगितीची कालमर्यादा सहा महिन्यांनंतर वाढविली असल्यास स्थगिती चालू राहील, अन्यथा स्थगिती आपोआप व्यपगत होते. या प्रकरणात स्थगितीचा कालावधी वाढवून दिल्याचे निदर्शनास येत नसल्याने पुढील कार्यवाहीचे आदेश शासनाचे कक्ष अधिकारी भास्कर पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने ठेकेदार शर्मा बंधूंवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र