पत्रकार भवन गैरव्यवहार; गुन्हे दाखल करण्याचे आदेश

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा पत्रकार संघाला शासनाने दिलेल्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार राजन शर्मा यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.


ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी तसेच शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता. तेव्हा कारवाई टाळण्यासाठी शर्तभंग कारवाईस स्थगिती आदेश घेणाऱ्या ठेकेदार शर्मा बंधूंचे अनेक कारनामे उघड होण्याची चर्चा रंगली आहे.


ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानालगत पत्रकार भवनाची भव्य वास्तू उभारली होती. १९८८ मध्ये शासनाने दिलेल्या भूखंडावर जुन्या पत्रकार संघाशी करार करून ठेकेदार राजन शर्मा व किशोर शर्मा या बंधूंनी इमारत उभारून पत्रकार संघाला जागा न देता गाळे व हॉलची परस्पर विक्री केली. यासंदर्भात, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे जिल्हा पत्रकार संघ गेली १२ वर्षे आवाज उठवून पाठपुरावा करीत आहेत. शासनाने ९ जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशात जिल्हा प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश दिले.


उपविभागीय अधिकाऱ्यांनीही शर्तभंग झाल्याचे नमूद केले असून महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने दिलेली स्थगितीची कालमर्यादा फक्त सहा महिन्यांपर्यंत लागू राहते. अपवादात्मक परिस्थितीत स्थगितीची कालमर्यादा सहा महिन्यांनंतर वाढविली असल्यास स्थगिती चालू राहील, अन्यथा स्थगिती आपोआप व्यपगत होते. या प्रकरणात स्थगितीचा कालावधी वाढवून दिल्याचे निदर्शनास येत नसल्याने पुढील कार्यवाहीचे आदेश शासनाचे कक्ष अधिकारी भास्कर पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने ठेकेदार शर्मा बंधूंवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.