शिवसेनेच्या १६ बंडखोरांना अपात्रतेच्या नोटीसचा वाद आता न्यायालयात

गुवाहाटी : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षेनुसार कोर्टात रंगणार असल्याची दाट शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशीविरोधात एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.


शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या चर्चेनंतर शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी ४ आमदारांना अशा एकूण १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील १६ आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली.


त्यानंतर आता शिंदे गटाने या नोटीशीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात दोन अपक्ष आमदारांचा याधीच अविश्वास प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. शिंदे गट आता पक्ष प्रमुख ठाकरे यांना मात देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments
Add Comment

पुण्यात पसरला विषारी धूर, ५ विद्यार्थी रुग्णालयात; २० हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजला सुट्टी, एक कंपनी बंद

पुणे : पुण्यात लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात आहे. या

Nagpur Blast : नागपूर कारखाना स्फोट; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला, आणि

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या