इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई

पुणे (हिं.स.) इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्या निमित्त आळंदीत येणाऱ्या वारकरी, भाविक, नागरिकांनी पाणी प्राशन करून आचमन करू नये, असे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.


संत ज्ञानेश्वर पालखीचे सोमवारी संध्याकाळी ०४ वाजता आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. कोरोना संकट काहीसे सरल्यानंतर यंदाच्या वर्षी निर्बंध शिथिल झाल्याने वारकरी, दिंडी, भाविक मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद, पुणे जिल्हाधिकारी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत.


भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यात्रा कालावधीत प्रतिबंधात्मक उपाय योजना या अंतर्गत इंद्रायणी नदीचे दूषित झालेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी मनाई करण्यात आली आहे तसेच नदी पात्रात कपडे धुण्यास सुद्धा मनाई करण्यात आली असून आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडून परिसरात याबाबत जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

वनजमीन शेतीसाठी भाड्याने देणे बेकायदेशीर

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागपूर : वनसंरक्षण अधिनियम, १९८० च्या कलम २ अंतर्गत केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी

शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार ५०० रुपये मिळणार; पण काय सांगतो नियम आणि शेतकऱ्यांना मिळणार किती फायदा ?

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट' पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या