रिफायनरी प्रकल्पातील विरोध मावळतोय : निलेश राणे

  71

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : कोकणातील रिफायनरी प्रकल्पातील विरोध आता मावळत चालला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्यानेच केंद्र सरकारला पत्र पाठवून रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून विनंती केली आहे. भारतीय जनता पक्षाने हा रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून प्रथमपासूनच भूमिका घेतली होती. हा प्रकल्प लवकर सुरू व्हावा म्हणून केंद्र सरकारने हे काम हाती घेतल्याचे भाजप नेते तथा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा म्हणून नुकतीच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची निलेश राणे यांनी भेट घेतली होती. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, जवळपास तीन लाख कोटी या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. म्हणूनच या भागातील नागरिकांना, कोकणवासीयांना या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक सोयीसुविधा मिळाव्यात या दृष्टीने आपणही भेट घेतली होती.


मग तो पाणीप्रश्न असो किंवा शैक्षणिक सुविधांचा प्रश्न असो त्याबाबत सरकारनेही विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करावा म्हणून आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचेही लक्ष वेधल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.


या रिफायनरी प्रकल्पामुळे या भागात फार मोठी आर्थिक उलाढाल होणार असून कोकणामध्ये हा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे. त्यामुळे या भागात विकासाची मोठी संधी आहे. चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा असाव्यात तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराचे एक मोठे केंद्र बनावे यादृष्टीने युवक युवतींना प्रशिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण