‘पोलीस वसाहतींतील इमारती दुरुस्त करा’

ठाणे (प्रतिनिधी) : शहरातील पोलीस वसाहतींच्या इमारतींची परिस्थिती गंभीर झाली आहे. तातडीने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांनी शासनाकडे केली.


आमदार संजय केळकर यांनी नवीन पोलीस वसाहत क्र. १ ते ६ तसेच इमारत ए, बी, सी या इमारतींची पाहणी करून पोलीस कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, माजी नगरसेवक संतोष साळवी आदी उपस्थित होते. वर्षांनुवर्षे इमारतींची दुरुस्ती केली नाही, छतावर पत्रे टाकले नाहीत, त्यामुळे भिंती, सज्जे यांची परिस्थिती नाजूक असल्याचे निदर्शनास आले.


स्ट्रक्चरल ऑडिट त्रयस्थ संस्थेमार्फत पुन्हा करण्याची या ठिकाणी गरज आहे. रहिवाशांच्या मागणीप्रमाणे त्वरित दुरुस्ती करून रहिवाशांना त्याच ठिकाणी राहायला मिळेल, अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे संजय केळकर यांनी सांगितले.


सातत्याने निधीची मागणी करूनही तो मिळत नसल्याने पोलीस वसाहतीतील शेकडो कुटुंबांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. या प्रकारास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचा पुनरुच्चार केळकर यांनी केला. मागील फडणवीस सरकारच्या काळात आमदार संजय केळकर यांनी दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी मंजूर करवून दुरुस्ती करून घेतली, याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे