स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य मोदी-आदित्यनाथ यांच्याकडून...

ठाणे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना हिंदुत्वाची शक्ती मिळाली. सावरकरांचे हिंदुत्व व भाजपचे हिंदुत्व यात काहीही फरक नसून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करीत आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी शनिवारी येथे केले.


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहर भाजपतर्फे गडकरी रंगायतनमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे ‘सावरकरांचा राजकीय संघर्ष’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भारत विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रुत चितळे, भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, ज्येष्ठ पत्रकार किरण शेलार, भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्टचे आकाश राऊत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे यांनी स्वातंत्र्यवीरांच्या साहित्य सागराला वाहिलेले नम्र नृत्य ‘स्वातंत्र्य सूर्य’ हा कार्यक्रम सादर केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रप्रेम काय असते, ते जगाला दाखवून दिले. त्यांच्या कार्यातून पुढील अनेक दशके तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ठाणे व सावरकर यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाजपचे शहर उपाध्यक्ष सचिन बी. मोरे यांनी सहकार्य केले.

Comments
Add Comment

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.