राजापुरात आज भाजपचा रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळावा

  92

राजापूर (प्रतिनिधी ) : राजापूर तालुक्यात धोपेश्वर-बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आता अंतिम स्वरूप आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून याबाबत आता सकारात्मक निर्णय होणार असून हा प्रकल्प राजापुरात उभारण्याबाबत हिरवा कंदील मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर राजापुरात भाजप राजापूर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आज रविवार २९ मे रोजी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे.


आज सायंकाळी ४ वाजता राजापूर शहरातील गुजराळी येथील श्री मंगल कार्यालयात स्वागत मेळावा होणार असून भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे व भाजप प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


या रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याच्या माध्यमातून रिफायनरी प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर करतानाच प्रकल्पाच्या माध्यमातून काय हवे आणि काय झाले पाहिजे याची चर्चा करून तशा मागण्यांचा अहवाल शिष्टमंडळ केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन त्यांना देणार आहे.


राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे सर्वत्र स्वागत होत आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारला पत्र देऊन या प्रकल्पासाठी जागा देण्यात येणार असल्याचे कळविले आहे. तर सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत हालचाली गतिमान झाल्याचे जठार यांनी सांगितले. केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर पाहणी करून तांत्रिक बाबीही तपासल्या जात आहेत.


या रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्यात भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली