यंदा आषाढी वारी होणार वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत

पुणे (हिं.स.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून आषाढी पायी वारी सोहळा काही मोजक्या वारकऱ्यांसमवेत लालपरीतून प्रवास करून पंढरीत साजरा करण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम, अटी व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर यंदा आषाढी पायी वारी सोहळा होणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी वारीच्या तयारीला लागले आहे.


यंदा आषाढी वारी सोहळा हा वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत साजरा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल ४० टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी वर्तविला आहे.


या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, विश्रांती, भोजन, रिंगण सोहळे, नदी आणि इतर परंपरागत ठिकाणांची पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी पाहणी केली.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद