यंदा आषाढी वारी होणार वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत

  54

पुणे (हिं.स.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून आषाढी पायी वारी सोहळा काही मोजक्या वारकऱ्यांसमवेत लालपरीतून प्रवास करून पंढरीत साजरा करण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम, अटी व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर यंदा आषाढी पायी वारी सोहळा होणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी वारीच्या तयारीला लागले आहे.


यंदा आषाढी वारी सोहळा हा वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत साजरा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल ४० टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी वर्तविला आहे.


या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, विश्रांती, भोजन, रिंगण सोहळे, नदी आणि इतर परंपरागत ठिकाणांची पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी पाहणी केली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या