महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाला फसवले

  70

'विकासाच्या नावाखाली जनतेला गूळ दाखवण्याची पवारांची जुनी परंपरा'


मुंबई : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची फसवणुक केली आहे. मध्यप्रदेशमध्ये आरक्षण मिळत मग महाराष्ट्रात का नाही?, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांनी विकासाच्या नावाखाली जनतेला गुळ दाखवला आहे. फसवणुक करणे आणि गुळ दाखवणे ही त्यांची परंपरा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ओबीसी समाज आता याला बळी पडणार नाही. कारण महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे समाजाला कळल्याने ते भडकले आहेत, म्हणून त्यांनी हे आंदोलन छेडले आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.


ते म्हणाले, ओबीसी समाजाचे महाविकास आघाडी सरकारवर राग आहे. आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी समाजाची फसवणूक केली असल्याचे ओबीसींना माहिती झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता भाजपला आरक्षण मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. ओबीसी समाजाच्या मनामध्ये राग आहे. तो व्यक्त करण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी आज ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. भाजपाने यावर मार्ग काढावा यासाठी समाजाने विनंती केली आहे. यावेळी भाजपाकडून महाविआचा निषेध करण्यात आला


पुढे ते म्हणाले, मध्यप्रदेश सरकार त्रिस्तरीय चाचणी ताकदीने पूर्ण करून दिल्या आहेत. आरक्षणासंदर्भातील तरतुदी न्यायालयाला पटवून देऊन पुन्हा ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवले आहे. यापूर्वी वेळ असूनही या चाचणी संदर्भात महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी पावले उचलेली नाहीत. जनेतचा भाजप आणि फडणवीसांवर विश्वास असल्यामुळं ओबीसी आरक्षणसाठी भाजपचं आंदोलन केलं आहे.


ओबीसी आरक्षणाबाबत समाजाच्या मनात सरकारविरोधात आक्रोश आहे, म्हणून ते भाजप कार्यालयासमोर आले आहेत. पुढील पाच वर्षांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत, हे समाजाला समजलं आहे. वेळ झाल्याने या निवडणुका होणार असून संघर्ष करुनही आरक्षण मिळेल असे वाटत नाही त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारले आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित